+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Mar 24 person by visibility 121 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्या वतीने आज ओबीसी सामाजिक संमेलन मेळावा भाजपा जिल्हा कार्यालयात पार पडला याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती.
ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांनी आपल्या मनोगता मध्ये जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांची मांडणी करत आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी चौधरी म्हणाले, ‘केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं ओबीसी समाजाचं हित नेहमीच जपले आहे. त्यातून ओबीसी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. ओबीसी समाजाचा खरा मारेकरी कॉंग्रेस पक्षच आहे.’
 खासदार धनंजय महाडिक म्हणाले, खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून जातीयवादी विचारांची पेरणी करत आहेत. त्यातून त्यांना काय साध्य करायचे आहे ? भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजाला नेहमीच झुकतं माप दिले आहे. केंद्रात २७ मंत्री ओबीसी समाजाचे आहेत. तर राज्यात भाजपचे २८ ओबीसी आमदार आहेत, याचा खासदार महाडिक यांनी आवर्जून उल्लेख केला. 
समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या १० वर्षात मोदी सरकारमुळे देशातील जनतेला न्याय मिळाला आहे. स्वयंघोषीत पुरोगामी कॉंग्रेस पक्षाे, मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षातील कामगिरीचा हिशोब मागण्यापूर्वी, कॉंग्रेस राजवटीतील कामगिरीचा हिशोब जनतेसमोर ठेवावा, असे आव्हान केले. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं पक्षाला ताकद मिळालीय, असं सांगितलं.
 मेळाव्याला जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, राहुल चिकोडे, राजसिंह शेळके, प्रमोद पाटील, अशोक माळी, बाळासाहेब जाधव, संतोष माळी, दीपक जाधव,महेश यादव, विद्या बनछोडे, विद्या बागडी, संध्या तेली उपस्थित होते.