Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरवअकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन ! गुणवत्तेनुसार सर्वसाधारण चार फेऱ्या!!शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!

जाहिरात

 

दक्षिणमध्ये २४ हजार लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- अमल महाडिक

schedule04 Dec 23 person by visibility 401 categoryराजकीय


महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २४ हजार पात्र लाभर्थ्यांना स्वखर्चाने आयुष्यमान कार्ड वितरित करणार आहे.’असे माजी आमदार अमल महाडिक यांनी जाहीर केले आहे. 
सर्वसामान्य लोकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड मिळावे या हेतूने हा निर्णय घेतला आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ रचनेच्या माध्यमातून घरोघरी हे कार्ड्स वितरित केले जातील. केंद्र शासनाची ही अभिनव योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अमल महाडिक यांचा प्रयत्न आहे. आयुष्मान भारत कार्ड घरबसल्या मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची धावपळ वाचणार असून भविष्यात चांगल्या आरोग्यविषयक सेवेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सर्वसामान्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आहे. या अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहेत. यासाठी आयुष्यमान कार्ड असणे अत्यावश्यक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes