Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!

जाहिरात

 

संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्कार प्रदान

schedule01 Oct 22 person by visibility 420 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संजय घोडावत यांनी स्वीकारला.
सामाजिक कार्यकर्ते अमित सचदेव यांनी महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार वैयक्तिक, सीएसआर,संस्थात्मक पातळीवर दिले जातात. एक सशक्त,चांगला आणि प्रभावी समाज घडविण्यात फाउंडेशनने दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   संजय घोडावत फाउंडेशनच्या वतीने कोरोना काळामध्ये पाच लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३५ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले.
  फाउंडेशनच्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्याअनेक ज्येष्ठांना होत आहे. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. गरजू मुलींसाठी स्वखर्चाने १९९५ मध्ये कन्या महाविद्यालयाची सुरुवात केली.
     हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फाउंडेशनचे चेअरमन संजय घोडावत म्हणाले, “फाउंडेशनने केलेल्या अपार कष्टामुळे हा पुरस्कार मिळालाय. समाजामध्ये आपण राहत असताना दानधर्म करणे, परोपकार करणे, इतरांचा चांगला विचार करणे हाच जगण्याचा खरा दागिना आहे तो सर्वांनी परिधान केला पाहिजे. परोपकाराची शक्ती ही अफाट आहे. चांगले कार्य करत राहणे हेच आपल्या फाउंडेशनचे तत्व आहे..

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes