Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्कार प्रदान

schedule01 Oct 22 person by visibility 416 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संजय घोडावत यांनी स्वीकारला.
सामाजिक कार्यकर्ते अमित सचदेव यांनी महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार वैयक्तिक, सीएसआर,संस्थात्मक पातळीवर दिले जातात. एक सशक्त,चांगला आणि प्रभावी समाज घडविण्यात फाउंडेशनने दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   संजय घोडावत फाउंडेशनच्या वतीने कोरोना काळामध्ये पाच लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३५ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले.
  फाउंडेशनच्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्याअनेक ज्येष्ठांना होत आहे. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. गरजू मुलींसाठी स्वखर्चाने १९९५ मध्ये कन्या महाविद्यालयाची सुरुवात केली.
     हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फाउंडेशनचे चेअरमन संजय घोडावत म्हणाले, “फाउंडेशनने केलेल्या अपार कष्टामुळे हा पुरस्कार मिळालाय. समाजामध्ये आपण राहत असताना दानधर्म करणे, परोपकार करणे, इतरांचा चांगला विचार करणे हाच जगण्याचा खरा दागिना आहे तो सर्वांनी परिधान केला पाहिजे. परोपकाराची शक्ती ही अफाट आहे. चांगले कार्य करत राहणे हेच आपल्या फाउंडेशनचे तत्व आहे..

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes