Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढीवालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाचीगुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळफुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूद

जाहिरात

 

संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्कार प्रदान

schedule01 Oct 22 person by visibility 342 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजय घोडावत फाउंडेशनला महात्मा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संजय घोडावत यांनी स्वीकारला.
सामाजिक कार्यकर्ते अमित सचदेव यांनी महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार वैयक्तिक, सीएसआर,संस्थात्मक पातळीवर दिले जातात. एक सशक्त,चांगला आणि प्रभावी समाज घडविण्यात फाउंडेशनने दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   संजय घोडावत फाउंडेशनच्या वतीने कोरोना काळामध्ये पाच लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३५ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले.
  फाउंडेशनच्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्याअनेक ज्येष्ठांना होत आहे. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. गरजू मुलींसाठी स्वखर्चाने १९९५ मध्ये कन्या महाविद्यालयाची सुरुवात केली.
     हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फाउंडेशनचे चेअरमन संजय घोडावत म्हणाले, “फाउंडेशनने केलेल्या अपार कष्टामुळे हा पुरस्कार मिळालाय. समाजामध्ये आपण राहत असताना दानधर्म करणे, परोपकार करणे, इतरांचा चांगला विचार करणे हाच जगण्याचा खरा दागिना आहे तो सर्वांनी परिधान केला पाहिजे. परोपकाराची शक्ती ही अफाट आहे. चांगले कार्य करत राहणे हेच आपल्या फाउंडेशनचे तत्व आहे..

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes