Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे 70 टक्के मतदानडीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभकार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांचे मतदान !लघु-मध्यम स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहित केल्यास नवीन उद्योजक घडतील – माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभूशाहूपुरीत भगवा झंझावात, प्रकाश नाईकनवरे, नीलिमा पाटील यांची जंगी रॅलीजिल्हा परिषदेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान ! मतमोजणी सात फेब्रुवारीला !!प्रभाग क्रमांक अकरामध्ये भगवे वातावरण ! महायुतीचे शक्तीप्रदर्शन, रॅलीत हजारोंचा सहभाग ! !दमसातर्फे पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहनजिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आज दुपारी घोषणासत्तेचा मुकुट नव्हे तर माझ्यासाठी जनतेचे प्रेम महत्वाचे – आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

दोस्तीची कथा सांगणारा ‘रुप नगर के चीते’सोळा सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

schedule08 Sep 22 person by visibility 481 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : दोन मित्रांमधील दोस्तीची कथा सांगणारा ‘रुप नगर के चीते’हा मराठी चित्रपट सोळा सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलाय का ?’ या टॅगलाइनवर हा सिनेमा आधारलेला आहे. मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्वाचे असतात हे सांगू पाहणारा हा सिनेमा असल्याचे दिग्दर्शक विहान सुर्यवंशी यांनी सांगितले.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकासह कलाकारांची टीम कोल्हापुरात आली होती. या सिनेमात करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, सना प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिनेमात मुग्धा चाफेकर, आयुषी भावे, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजत कपूर हे कलाकार अहेत.
या सिनेमाची निर्मिती एस एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली आहे. खरी मैत्री म्हणजे आनंदाचा ठेवाच, हा ठेवा जपण्यासाठी माणसाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हाच विषय रंजकपणे मांडला आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा असे आवाहनही कलाकारांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes