Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीरशैव बँकेची निवडणूक बिनविरोध, नवीन चेहऱ्यांना संधी५० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या काँग्रेसकडे मुलाखती ! इच्छुकांची संख्या ३२९ ! !पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्रा. निशा मुडे, उपाध्यक्षपदी डॉ. जगन्नाथ पाटील, सचिवपदी विश्वजीत भोसलेहौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून वसुभूमी प्रथम आजीबाईंची शाळा…!सत्वशिला साळुंखे यांचे निधन काँग्रेसकडून मुलाखती ! माजी महापौर-नगरसेवकासह पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक ! !हसन मुश्रीफांकडून आदिल फरासांची उमेदवारी घोषितनूतन मराठी विद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभसरोजिनी कॉलेज – अॅस्टर आधारमध्ये सामंजस्य करार, नर्सिंग कोर्स सुरू होणार 

जाहिरात

 

दोस्तीची कथा सांगणारा ‘रुप नगर के चीते’सोळा सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

schedule08 Sep 22 person by visibility 464 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : दोन मित्रांमधील दोस्तीची कथा सांगणारा ‘रुप नगर के चीते’हा मराठी चित्रपट सोळा सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलाय का ?’ या टॅगलाइनवर हा सिनेमा आधारलेला आहे. मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्वाचे असतात हे सांगू पाहणारा हा सिनेमा असल्याचे दिग्दर्शक विहान सुर्यवंशी यांनी सांगितले.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकासह कलाकारांची टीम कोल्हापुरात आली होती. या सिनेमात करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, सना प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिनेमात मुग्धा चाफेकर, आयुषी भावे, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजत कपूर हे कलाकार अहेत.
या सिनेमाची निर्मिती एस एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली आहे. खरी मैत्री म्हणजे आनंदाचा ठेवाच, हा ठेवा जपण्यासाठी माणसाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हाच विषय रंजकपणे मांडला आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा असे आवाहनही कलाकारांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes