Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव

जाहिरात

 

८६ हजार कोटींचा रस्ता करुन २७ हजार शेतकऱ्यांना उघड्यावर का टाकताय- सतेज पाटील

schedule07 Mar 25 person by visibility 121 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रत्नागिरी -नागपूर महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास का धरला जातोय ? ८६ हजार कोटीचा रस्ता करून २७ हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकण्याचे काम का केले जात आहे असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी  विधानपरिषदेत उपस्थित केला.  राज्यात प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करतोय असे वातावरण केले जात आहे.समृद्धीची चर्चा होते, पण समृद्धीचा दोन वर्षातला टोल ५०० कोटींवर गेलेला नाही. अपेक्षित टोल समृद्धी महामार्गाकडून मिळाला नसल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. निवडणुकीपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची भूमिका महायुतीने कोल्हापुरात घेतली होती. पण आता महायुतीचे आमदारच शक्तीपीठाच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत ही जनतेची फसवणूक नव्हे का असा सवाल करत शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नसल्याचे आमदार  पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes