Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारघाटगे ग्रुपतर्फे वसंतराव घाटगेंची जयंती उत्साहात, कंपन्यांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव !उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

जाहिरात

 

बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागर

schedule09 May 25 person by visibility 41 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आगामी महानगरपालिकेची  निवडणूक महायुती सक्षमपणे लढवून जिंकणारच आहे. एकूणच राज्यात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकजुटीने सुरु केलेली लोकहिताच्या कामाची पद्धत नागरिकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सामील होण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. येणाऱ्या सर्वांचे स्वागतच आहे, परंतु, महायुती कोणावरही अवलंबून नाही हे गेल्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर आणि मतदारांनी दिलेल्या कौलावर दिसून आले आहे.’असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली. क्षीरसागर म्हणाले, ‘शहरातील मतदार महायुतीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शहर विकासाद्वारे शहराचे बदलत चाललेले रुप त्यातून मतदारांच्या व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया यातून नागरिकांनीच महायुतीला निवडून देण्याचे मनोमन ठरविले आहे. येणारी महानगरपालिका महायुती एकजुटीने लढवून, जिंकून दाखवेल,’

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा कौल महायुतीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे. परंतु, गाफील न राहता नवीन सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शाखा उद्घाटन, शासनाच्या योजना यामाध्यमातून जनसंपर्क वाढवा.’असे ही क्षीरसागर म्हणाले.

या बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, शहर समन्वयक सुनील जाधव, गणेश रांगणेकर, कमलाकर जगदाळे, तन्वीर बेपारी, प्रभू गायकवाड, अर्जुन आंबी, अंकुश निपाणीकर, विनय वाणी, मुकुंद सावंत, कपिल केसरकर, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, संदीप चीगरे, देवेंद्र खराडे, मुन्ना तोरस्कर, अमर क्षीरसागर उपस्थित होते.        

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes