मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार डॉ.जब्बार पटेल यांना जाहीर, 26 जूनला पुरस्कार वितरण समारंभ
schedule09 Jun 25 person by visibility 265 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी राजर्षी शाहू जयंतीदिनी दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 26 जून 2025 रोजी या पुरस्काराचा वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू पुरस्काराचे यंदाचे 39 वे वर्षे आहे. यंदा राजर्षी शाहू महाराजांची 151 वी जयंती आहे. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. पटेल यांना शाहू जयंतीदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे 23 जून 1942 रोजी जब्बार पटेल यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या हरीभाई देवकरण हायस्कूलमध्ये झाले. येथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्याने 1968 मध्ये पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. 1970 मध्ये मुंबईहून चाइल्ड हेल्थ पदविका प्राप्त केली. पटेल यांना कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी जवळचा संबंध राहिले. त्यांनी थिएटर अकॅडमी नावाची प्रायोगिक नाटकासाठीची नाट्य संस्था स्थापन केली. त्यांनी 1970 मध्ये विजय तेंडुलकर लिखित अशी पाखरे येती नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. 1972 मध्ये घाशीराम कोतवाल हे ऐतिहासिक नाटक सादर केले. 1975 मध्ये त्यांनी सामना या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. 1978 मध्ये त्यांनी पु ल देशपांडे यांचे तीन पैशाचा तमाशा हे नाटक प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्याच वर्षी मंगेशकर कुटुंबीयांनी निर्मिती केलेला जैत रे जैत हा सिनेमा दिग्दर्शित केला 1979 मध्ये सिंहासन या सिनेमाचे दिग्दर्शन केले. पुढे उंबरठा या सिनेमाची निर्मिती व दिग्दर्शन हे केले. त्यांच्या, एक होता विदूषक आणि मुक्ता या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत
विशेष म्हणजे त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीवर चित्रपट व माहितीपट बनवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 2012 मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर सिनेमाची निर्मिती केली. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंडित कुमार गंधर्व यांच्यावर माहितीपट केले. विविध संस्थांनी पटेल यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. 1982 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, सुवर्णा पत्की, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते.
रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू पुरस्काराचे यंदाचे 39 वे वर्षे आहे. यंदा राजर्षी शाहू महाराजांची 151 वी जयंती आहे. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. पटेल यांना शाहू जयंतीदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे 23 जून 1942 रोजी जब्बार पटेल यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या हरीभाई देवकरण हायस्कूलमध्ये झाले. येथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्याने 1968 मध्ये पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. 1970 मध्ये मुंबईहून चाइल्ड हेल्थ पदविका प्राप्त केली. पटेल यांना कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी जवळचा संबंध राहिले. त्यांनी थिएटर अकॅडमी नावाची प्रायोगिक नाटकासाठीची नाट्य संस्था स्थापन केली. त्यांनी 1970 मध्ये विजय तेंडुलकर लिखित अशी पाखरे येती नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. 1972 मध्ये घाशीराम कोतवाल हे ऐतिहासिक नाटक सादर केले. 1975 मध्ये त्यांनी सामना या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. 1978 मध्ये त्यांनी पु ल देशपांडे यांचे तीन पैशाचा तमाशा हे नाटक प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्याच वर्षी मंगेशकर कुटुंबीयांनी निर्मिती केलेला जैत रे जैत हा सिनेमा दिग्दर्शित केला 1979 मध्ये सिंहासन या सिनेमाचे दिग्दर्शन केले. पुढे उंबरठा या सिनेमाची निर्मिती व दिग्दर्शन हे केले. त्यांच्या, एक होता विदूषक आणि मुक्ता या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत
विशेष म्हणजे त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीवर चित्रपट व माहितीपट बनवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 2012 मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर सिनेमाची निर्मिती केली. पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंडित कुमार गंधर्व यांच्यावर माहितीपट केले. विविध संस्थांनी पटेल यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. 1982 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, सुवर्णा पत्की, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते.