Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !नविद मुश्रीफांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! गोकुळच्या विस्तारासाठी सरकारकडून निश्चित मदत !!सोळा जूनला शाळा प्रवेशोत्सव ! लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी ! फुटले पेव, जिल्ह्यात १११ खासगी अॅकेडमी !  शिक्षण विभागाकडून ना तपासणी-ना नियंत्रण !!गावडे कुटुंबियांतर्फे म्हसळा शाळेस ५१ हजाराची देणगीमनसेतर्फे गुरुवारी शैक्षणिक साहित्याचे वाटपसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायनमहापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न –राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न –राजेश क्षीरसागर

schedule10 Jun 25 person by visibility 85 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पर्यावरणातील बदलामुळे व मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी एकावेळी झाल्यामुळे २०१९ व २०२१ मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) प्रकल्प राबवित आहोत. जागतिक बँकेच्या माध्यमातून लवकरच ५०० कोटीच्या कामाचे टेंडर काढू. पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३२०० कोटीचा प्रकल्प राबवत असून दुसऱ्या टप्प्यात मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी, (१० जून २०२५) पूरनियंत्रण प्रकल्प व विविध विकास कामांच्या आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, विजया यादव व शिल्पा दरेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील अधिकारी उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, ‘आयटी सेक्टरला चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयटी इंजिनियर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते. सांगलीला आयटी क्षेत्र चांगल्या पध्दतीने विकसीत करण्यासाठी प्रयत्न करू. आयटी कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी जागा निवडावी.  यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, त्यामुळे रोजगार उपलब्धता होईल. सौर उर्जेवर उद्योगधंद्याना वीजपुरवठा यासाठी लवकरच धोरण आखत आहे.’

महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील पूर व्यवस्थापनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये शहरातील पूर समस्या, पूर प्रभावित क्षेत्र, शेरीनाला, सांडपाण्याशी संबंधित समस्या, पाणी साठत असलेल्या शामरावनगर येथील प्रस्तावित कामे व दीर्घकालीन आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीनंतर क्षीरसागर यांनी शामरावनगर व शेरीनाला येथे पाहणी करून विविध सूचना केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes