Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायनमहापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!मित्राच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी देण्यासाठी प्रयत्न –राजेश क्षीरसागरराष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन साजरामहावितरणला ग्राहकांकडून तक्रारींचा झटका ! ऊर्जा दरबारात चुकीच्या कामकाजावर प्रकाशझोत !!कोल्हापूरसह अनेक शहरात होणार महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे ! कृष्णराज महाडिकांचा पुढाकार, वोलू संस्थेची करारमानाचा राजर्षी शाहू पुरस्कार डॉ.जब्बार पटेल यांना जाहीर, 26 जूनला पुरस्कार वितरण समारंभ एआय, रोबोटिक्स अभ्यासक्रमाची सुरुवात करुन  विवेकानंदची शैक्षणिक चळवळीत आघाडी-प्रकाश आबिटकरकोल्हापुरात माळी भवन उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करू –अमल महाडिकबांधकाम व्यासायिक- वास्तुविशारदांचे विकासाचे व्यापक व्हिजन शहराला गतीमान बनवेल-प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

एआय, रोबोटिक्स अभ्यासक्रमाची सुरुवात करुन  विवेकानंदची शैक्षणिक चळवळीत आघाडी-प्रकाश आबिटकर

schedule09 Jun 25 person by visibility 608 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ एआय आणि रोबॅटिक्स या ज्ञानक्षेत्राचा जगभरात वेगाने विस्तार होत आहे.  आज या तंत्रज्ञानाच्या मदतीने जग क्रांतीकारक वाटचाल करीत आहे.  अगदी शेताच्या बांधापासून चांद्रयान मोहिमेपर्यंत सर्व प्रकारची कामे सुलभ होत आहेत. या ज्ञानशाखेची माहिती व ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यासाठी एआय आणि रोबॅटिक्स या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने करुन महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीत आघाडी प्राप्त केली आहे. ’असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आयोजित शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची १०७ व्या जयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.  येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात हा जयंती समारंभ झाला. याप्रसंगी एआय आणि रोबॅटिक्स या नवीन अभ्यासक्रमाचे झाले. तसेच अभ्यासक्रम पुस्तिकेचे वाटप विद्यार्थी व शिक्षकांना करण्यात आले.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणले.  शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी कार्य केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी सदैव तत्पर असले पाहिजे. शिक्षकांनी, बापूजींच्या विचार व कार्याचा वारसा आत्मसात करुन विद्यार्थी घडवावेत व संस्थेचा नावलौकिक वाढवावा.’

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले, ‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षकाला गुरुदेव कार्यकर्ते संबोधले. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्याला ज्ञानप्रवाहात आणले.  शिक्षकांना विद्यार्थीभिमुख आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा आग्रह धरला.विवेकानंद शिक्षणसंस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द बनले आहे.’

 याप्रसंगी डॉ. एकनाथ आळवेकर, डॉ. डी. आर. तुपे, प्रा. हवालदार, प्रा दिव्या बाबर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले संस्थेतर्फे मंत्री आबिटकर यांचा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  सिरपचे अधिकारी रोहित शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय गुरव यांचा सन्मान करण्यात आला.  संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्था सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख  श्रीराम साळुंखे,   विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार, श्रीमती श्रध्दा गुरगुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कविता तिवडे व प्रा.गीतांजली साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सहसचिव (प्रशासन) एस. एम. गवळी यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes