Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!स्वंयसिद्धा-व्ही. टी. पाटील फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभकोल्हापुरात ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणीएअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात, नागरी वस्तीत विमान कोसळलेकोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !

जाहिरात

 

सोळा जूनला शाळा प्रवेशोत्सव ! लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी !

schedule11 Jun 25 person by visibility 2274 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी सोळा जून २०२५ रोजी “शाळा प्रवेशोत्सव” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सहा ते चौदा  वयोगटातील सर्व बालकांची शंभर  टक्के पटनोंदणी होण्याकरिता या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी  नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण, शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थाचे वाटप असे उपक्रम राबविण्या येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.

  शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळापूर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शंभर शाळांना भेटी देणे या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींचे नियोजन आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पटनोंदणीमध्ये वाढ होण्यासाठी शाळानिहाय उद्दिष्ट आहे. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी शाळेस प्रथम दिनी प्रेरणादायी भेट देवून शालेय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता  इतर सोयी सुविधांचा आढावा घ्यावा. शाळा वर्षभरासाठी दत्तक घेवून भौतिक सुविधा  शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी बहुमोल योगदान द्यावे हा उद्देश आहे.

विद्यार्थी, शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी  ग्रामस्थांशी सुसंवाद साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, याबाबत आवश्यक उपाययोजना सूचविण्याची विनंती करण्यात आली असून हा उपक्रम समाज, पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे  बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे, तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येत आहे.सरकारमार्फत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध,एनएमएमएस सारख्या स्पर्धा परीक्षा तसेच सरकारी  स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहेच, त्याला समाजाचीही साथ मिळण्याची अपेक्षा  डॉ. शेंडकर  यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes