Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारकोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटपकंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्नय वाटपकेंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूकविद्या मंदिर शेळप शाळेत  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादप्रत्येक पालकाने आपल्या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत – आयुक्त के.  मंजूलक्ष्मी.केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली डॉ डी. वाय. पाटील यांची भेटप्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम- डॉ. विश्वनाथ एन. मगदूमहद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी वीस गावांत बंद

जाहिरात

 

जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर आमदार राजेश क्षीरसागरांच्याकडून दत्तक

schedule16 Jun 25 person by visibility 419 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारच्या शिक्षणविषयक सर्व योजना विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शालेय गुणवत्तेच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत.  आजचा विद्यार्थी भविष्यात राष्ट्राभिमानी, आत्मनिर्भर, यशस्वी व सुसंस्कारित नागरिक म्हणून घडेल, यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने "शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम साजरा करण्यात आला. यानिमित जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत राज्य नियोजन मंडळाचे  आमदार  क्षीरसागर यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देवून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 

 विद्यार्थांना दर्जेदार शिक्षणासह मुलभूत सोयी सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अशा शाळांना प्राधान्याने निधी देवून तेथील विकासकामे तडीस नेली जाणार असल्याचे सांगत क्षीरसागर जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर दत्तक घेतल्याचे जाहीर केले. यासह याशाळेतील विकास कामांसाठी आमदार फंडातून तात्काळ दहा लाखांचा निधी जाहीर केला. या फंडातून मैदानाची सुरक्षा भिंत, दुसऱ्या मजल्याचा संरक्षक कठडा, नवीन दोन खोल्या, खो- खो व कबड्डी मैदान विकसित करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.  यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अमर क्षीरसागर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनअधिकारी रा.व्ही.कांबळे, शाळेच्या विश्वस्त सौ.कसबेकर, मुख्याध्यापक नितीन चौगुले, उपमुख्याध्यापिका खतीब, तहसीलदार गौसमोद्दिन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास कांबळे, अश्विनी जंगम, ज्योती टोणपे, विद्या चीपरे, आशा चौगले, अमित गुरव, संस्कार शिबीर व्याख्याते सुजय देसाई, विजय पाटील, मल्हारी पाटील, शांताराम सुतार आदी उपस्थित होते. कविता सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes