Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारकोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटपकंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपकेंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूकविद्या मंदिर शेळप शाळेत  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादप्रत्येक पालकाने आपल्या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत – आयुक्त के.  मंजूलक्ष्मी.केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली डॉ डी. वाय. पाटील यांची भेटप्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम- डॉ. विश्वनाथ एन. मगदूमहद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी वीस गावांत बंद

जाहिरात

 

प्रत्येक पालकाने आपल्या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत – आयुक्त के.  मंजूलक्ष्मी.

schedule16 Jun 25 person by visibility 23 categoryशैक्षणिक


महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. 'मराठीमध्ये चांगली प्रगती कराच पण त्याचबरोबर इंग्लिश व अन्य भाषांमध्ये संभाषण करता आले पाहिजे, त्यासाठी त्या भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, त्या भाषेमध्ये बोलण्याचा सराव करा, चुकले तरी बोलण्याचे धाडस कायम ठेवा. ’ असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त  के. मंजूलक्ष्मी यांनी केले.

 मनपा पद्मभूषण वि.स. खांडेकर विद्यालयांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाप्रसंगी त्या बोलत होत्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश वाळवेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होते.  प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘सर्वांनी  मेहनत घेतल्यास, मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास आपण निश्चितच आपले ध्येय गाठू शकतो. आपण मोठे होऊ शकतो. शाळेनेही विद्यार्थ्यांच्या मध्ये विविध कौशल्य विकसित होण्यासाठी उपक्रम राबवावेत.’

याप्रसंगी त्यांच्या हस्ते शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके ,वह्या ,गणवेश स्कूलबॅग,शूज, पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्कार शिबिर ही घेण्यात आले. यामध्ये संदीप पाटील यांनी पालकांनी आपल्या मुलांशी कशाप्रकारे वागावे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आचरण ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले. मर्दानी खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक ही करून दाखविले. तसेच प्रशासकांच्या हस्ते  संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, मुख्याध्यापक द्रोणाचार्य पाटील,  अनिता पाटील, शिवशंभू गाटे, सागर सारंग, श्रीकांत देसाई, दयानंद जगदाळे, पवन शर्मा उपस्थित होते. सुधाकर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. किस्किंदा मुंडे यांनी आभार मांनले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes