Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणविवेकानंद कॉलेज म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महाद्वार - प्राचार्य अभयकुमार साळुंखेमहिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेशआरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याउद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती

जाहिरात

 

अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलन

schedule27 May 26 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :   'सारथी' आणि  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुढील पंधरा दिवसात एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अन्यथा तीव्र 'हलगी बजाव' आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघ युवा आघाडीतर्फे आयोजित युवक मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे प्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रतीक साळुंखे, विवेक तडोलकर उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, "सध्या शैक्षणिक प्रवेशांची धामधूम सुरू आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. त्यातच गेल्या आठ महिन्यांपासून महामंडळाच्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा रखडल्याने कर्जदार तरुण हवालदिल झाले आहेत. 'सारथी' संस्थेचे सर्वच उपक्रम सध्या ठप्प आहेत. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी चांगल्या चाललेल्या या संस्था बंद पाडण्याचा डाव मराठा तरुण कधीही सहन करणार नाहीत."आगामी काळात जिल्ह्यातील मराठा महासंघाची मोठी जबाबदारी युवकांवर सोपवली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. डॉ श्रीराम साळुंखे, विवेक तडोलकर, सतेज पाटील, महेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिक साळुंखे यांनी स्वागत केले. मेळाव्यास उपस्थित डॉ लक्ष्मीकांत नलावडे, राज पाटील, तुषार पाटील, संदीप पोवार, किरण भोसले, आयुष पाडळकर, विराज पाटील, प्रसाद पाटील, संजय राऊत, केदार साळोखे, नीलेश जाधव आदी उपस्थित होते. सूर्यभान इंगळे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes