Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव

जाहिरात

 

डॉ. अरविंद जत्ती यांचे शनिवारी व्याख्यान

schedule30 Jan 25 person by visibility 314 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) शरण साहित्य अध्यासनाच्या कार्यारंभानिमित्त बंगळुरू येथील बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी दिली आहे. 
शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात डॉ. अरविंद जत्ती हे 'शरण साहित्य: संकल्पना आणि प्रासंगिकता' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि बसवकल्याण येथील अनुभव मंटपाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांची प्रमुख उपस्थिती असेल. या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. करेकट्टी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes