Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बुधवारी संघ गंगा के तीन भगीरथ नाटकाचा प्रयोग, आरएसएसची वाटचाल उलगडणार पाचा फबदेवराज बोटिंगचे अमर जाधव यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कारमहादेवीसाठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा  पाठिंबा सर्किट बेंच मंजुरीबद्दल शिवसेनेकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव ! कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर –राजेश क्षीरसागर सर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव !सत्ताधाऱ्यांची आश्वासने नकोत, महादेवी हत्तीण किती दिवसात परत येणार ते सांगा-सतेज पाटीलहॉटेल मालक संघातर्फे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनधुआँ जो कुछ घरों से उठ रहा है…न पूरे शहर पर छाए, तो कहना ! मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षेचे उपाय

जाहिरात

 

पाचा फब

schedule04 Aug 25 person by visibility category

 

कोल्हापूर:प्राचार्य रा.कृ. कणबरकर माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर हे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या जीवनात त्यांचा अनेक विद्यार्थी,प्राध्यापक,आणि समाजातील अनेक मान्यवरांशी संबंध येऊन गेला आणि आठवणींच्या रूपाने  त्यांच्याकडे तो ठेवा आहे.यातून त्यांना काही अनुभव आले असतील.सर्व ज्ञान अनुभवजन्य असते. या दृष्टीने आम्ही त्यांच्या आठवणींचे"प्राचार्य कणबरकर आठवणी आणि अनुभव" ग्रंथ रूपाने प्रसिद्ध करावयाचे ठरविले असून त्याचा लाभ पुढच्या पिढीला सुद्धा होईल. त्या करिता त्यांच्या बरोबर काम केलेल्या त्यांच्या संपर्कातील सहकारी ,तसेच त्यांनी ज्या ज्या महाविद्यालयात व विद्यापीठात  काम केले तेथील विद्यार्थी यांचेकडून आठवणींच्या स्वरूपात लेख,  साहित्य मागविण्यात येत आहेत . .
  लेख लिहिताना प्राचार्य कणबरकर साहेबांचा कोणता गुण किंवा पैलू आपणास विशेष करून भावला याचा उल्लेख करणे अपेक्षित आहे .
अशाप्रकारे संकलीत झालेल्या लेखांचे संपादन व संकलन करण्यासाठी प्राचार्य कणबरकर साहेंबांच्या विचाराने प्रेरित असणारे प्रा .डॉ भालबा विभूते, प्रा.डॉ डी यू पवार , प्रा.डॉ रमेश जाधव , प्रा डॉ बी एम हिर्डेकर , प्रा.डॉ टी एस पाटील, प्रा डॉ दिनकर पाटील  व डॉ नमिता खोत ( प्राचार्य कणबरकर सरांची कन्या ) यांची समिती गठीत केली आहे
.   तरी  सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण खालील पत्त्यावर आपले लेख सॉफ्ट कॉपी( word file ) किंवा हार्डकॉपी दि 30 सप्टेंबर २०२५ पर्यंत आपल्या नाव ,पत्ता ,मोबाईल नंबर व ईमेल सहीत पाठवून द्यावी . सदर साहित्य , लेखासाठी कोणतीही शब्द मर्यादा नाही
  पत्ता:डॉ नमिता बाबासाहेब खोत
वक्रतुंड, प्लॉट नं २१ , आर के नगर सोसा नं ४
मोरेवाडी, कोल्हापूर-४१६०१३
मो .नं  ९८९००७०४०४(whats up) 
Email - namitalibrarian@gmail.com .
_______________________________

 प्रति.,
माननीय संपादक/ व्यवस्थापक साहेब . 

     आपल्या लोकप्रिय दैनिकात वरील बातमी सर्व आवृत्ती मध्ये प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती . 

 कळावे, 
आपली विश्वासू
 डॉ. नमिता बाबासाहेब खोत 
कोल्हापूर मो. नं. 9890070404

णणजझ त

schedule31 May 25 person by visibility 203 category

संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश

schedule18 Apr 25 person by visibility 282 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४ हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप निर्माण केली आहे.

या यशाबद्दल विद्यापीठाचे  विश्वस्त  विनायक भोसले,  कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,  कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,  क्रीडा अधिकारी  सुर्यजीत घोरपडे यांनी ओंकारचे अभिनंदन केले. या यशामध्ये विद्यापीठाचे चेअरमन  संजयजी घोडावत यांचे  प्रोत्साहन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ओंकारच्या या मेहनती आणि कौशल्यामुळे त्याची निवड २०२५ मध्ये होणाऱ्या
अर्नोल्ड क्लासिस स्पर्धेसाठी झाली आहे.

अभाविप

schedule23 Dec 22 person by visibility 564 category


कोल्हापूर :  "जेथे जेथे विद्यार्थी आहे, तिथे तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत असेल" असा विश्वास अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशच्या तीन दिवसीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. 
 अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत मांडत असताना प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यांची माहिती उपस्थितांना सांगितली. अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वजण अतिशय उत्साहाने साजरा करीत आहोत.     अनिल ठोंबरे म्हणाले, " बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली अशा छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व संघर्षाच्या लढ्याच्या प्रतिनिधित्वाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात  ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन होत आहे " याचा मला विशेष आनंद असल्याचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.
या अधिवेशनात वर्ष २०२२ - २०२३ ची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. आज या नविन वर्षासाठी पुननिर्वाचित घोषित झालेल्या प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते व प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यांचा पदभार स्विकारला. 
 
G20 : विश्वपटल पर भारत या विषयावर अभाविप चे क्षेत्रीय सहसंघटन मंत्री राय सिंह यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. तर पुढील अमृत काळामध्ये तरूणांची भुमिका ही महत्वाची राहणार आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. येत्या काही वर्षांत भारतात देशा बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, हाच दूर दृष्टीकोन ठेवून विद्यार्थी परिषदेने वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ या गतिविधी ची स्थापना केली होती. मी, माझ गाव, माझ शहर इतकाच विचार न करता जागतिक पातळीवरचा विचार करण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी तरूणांना केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes