केमटी रोजंदारी कर्मचारी कायम होणार, दोन दिवसात आदेश राजेश क्षीरसागर
schedule30 Jul 26 person by visibility 7 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर केएमटीकडील १५६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या दोन दिवसात त्यासंबंधी आदेश काढला जाईल. त्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. गुरुपौर्णिमेदिनी आमदार क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी, केएमटी कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याबद्दल आभार मानले. केएमटीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरू होता. अनेक वर्षे काम करुनही नोकरीत कायम न होण्याची खंत कर्मचाऱ्यांची होती. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला, त्यांना नोकरीत कायम करण्याचा आदेश दोन दिवसात मिळेल. कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला याबद्दल समाधानी आहे अशी भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.