Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेटसर्जन्स वीकनिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रम चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्यामहामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कारविकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूडकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरागोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जाहिरात

 

मुक्त संवादमध्ये उमटल्या विकासाभिमुख शहरासंबंधीच्या भावभावना

schedule19 Jun 24 person by visibility 540 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी सूचना आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दैनंदिन कामांबाबतच्या तक्रारी संकलित करण्यासाठी आयोजित केलेल्या मुक्त संवाद कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिकेच्या कामाबाबत शेकडो तक्रारी आणि विकासाबाबत अनेक महत्वाच्या सूचना दिल्या.
अ माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. शहरातील समस्यांच्या निराकरणासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी शहराच्या विकासाची तळमळ असलेल्या शहरवासीयांचा दबाव गट निर्माण करणे हा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले
कोल्हापूरचा शाश्वत विकास कसा असावा याबाबत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र किंकर, प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूर आणि वृक्ष मित्र संघटनेच्या सविता साळोखे, सावली चे किशोर देशपांडे, सिटिझन बटालियनचे डॉ. प्रीतम शहा, सी. ए.मनोज प्रसादे, डॉ. विनायक दिवाण, गजानन मुनिश्र्वर, नेस्टी सोशल फाउंडेशनचे अमर संकपाळ, वृक्षप्रेमी संघटनेचे अमोल बुध्ढे, निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले प्रमोद रायरीकर, सतीश आंबर्डेकर, प्रा. मीनल व्हटकर, चैतन्य ग्रुप चे दत्तात्रय अंजनेकर यांनी आपल्या सूचना मांडल्या.कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे अभिजीत कुलकर्णी, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी विकासाच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना केलय 
  यामध्ये प्रामुख्याने टिकाऊ रस्त्यांची बांधणी, पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन, कचरा उठाव आणि वर्गीकरण तसेच प्रक्रियेसाठी उपाय, मार्केट मधील कचरा भटक्या गायी म्हशींना देण्यासाठी गोशाळा, शहराच्या प्रवेशद्वारावर मोठी पार्किंग आणि तेथून शटल सर्व्हिस, उद्यान खाते  अशा वैविध्यपूर्ण विषयावर सूचना करण्यात आल्या. शहरातील पार्किंग व्यवस्था, अतिक्रमण, फेरीवाला झोन यासंबंधी नागरिकांच्या सूचना आहेत.
 प्रकाश घाडगे, संदीप कुंभार, कविता बंकापुरे, अविनाश पेंढुरकर, धनाजी भोसले, संभाजीराव पवार, पारस पालीच्या, हर्शांक हरळीकर, रितेश बोडके, राहुल पाटील, संतोष लाड, राजू मोरे, ज्येष्ठ नागरिक प्रकाश मोरे आदींनी आपल्या तक्रारी मांडल्या. 
 माजी नगरसेवक विजय खाडे यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी यापुढे होणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओंकार गोसावी, अमेय भालकर, सुनील पाटील, ऋतुराज नढाळे यांनी विशेष परिश्रम केले.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes