Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळानूतन मराठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरीपाचवी शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस परीक्षेसंबंधी शिक्षकांसाठी कार्यशाळाजरगनगरातील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाकोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर बनविण्यासाठी प्लॅनिंग-जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

हद्दवाढीला विरोधच, वीस गावात  बंद ! इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही !!

schedule17 Jun 25 person by visibility 194 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर शहरालगतच्या वीस गावात मंगळवारी (१७ जून २०२५) कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार बंद होते. प्रमुख चौकात एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांनी हद्दवाढीला विरोध कायम राहील असा इशारा दिला. सरकारने, ग्रामीण भागातील जनतेच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला तर आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्का टाकू. हद्दवाढीच्या विरोधात लढत राहू, एक इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही असा निर्धार हद्दवाढ विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर, वळीवडे, पीरवाडी,  आंबेवाडी, नागदेववाडी, शिये, नागाव, गोकुळ शिरगाव, पुलाची शिरोली, कळंबे तर्फे ठाणे, बालिंगा, वडणगे, शिंगणापूर या गावात बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने बंद होती. हद्दवाढीला विरोध दर्शविणारे फलक प्रमुख चौकात उभारले होते. वीस गावातील बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला होता. पुलाची शिरोली येथे काही तरुणांनी हद्दवाढीच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ‘शोले’ सिनेमा स्टाइल झालेल्या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाची धावपळ झाली. पोलिसांनी, हस्तक्षेप केल्यानंतर तरुण पाण्याच्या टाकीवरुन उतरले. हा प्रकार वगळता वीस गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर बंद पाळण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes