महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रगत तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर व्हावा’ असे मत नरिशिंग फार्म चे मुख्य कार्यकारी संचालकदिवाकर बेडेकर यांनी व्यक्त केले. या दोन दिवसीय परिषदेत विविध भागातून सुमारे शंभरहून अधिक सदस्यांनी सहभाग घेतला.
सायबर महाविदयालयात आयोजित "नव्या जागतिक क्रमवारीत भारत " या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सायबरचे कार्यकारी विश्वस्त व सचिव डॉ. .आर.ए.शिंदे यांनी शिक्षण संस्थामधून जबाबदार युवकांची फळी घडवण्याचे काम केली जाण्याची अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. विश्वस्त चार्टड अकाउन्ट ऋषिकेश शिंदे यांनी सायबर महाविदयालयातर्फे राबवण्यात येणार असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. डॉ. रजनी कामत यांनी चर्चासत्रात मांडणी केली. डॉ किशोरकुमार, 'डॉ. पूजा पाटील, व.डॉ. अजय शिंदे यांनी केले सूत्रसंचालन केले. डॉ. आर.पी.जोशी (पारिजात) यांनी आभार मानले.
परिषदेत प्रा. डॉ विश्वजित दास, प्रा. डॉ. यशवंत सिंग आय. आय.टी.मुंबईचे डॉ. शाम आसोलकर सायबर चे संचालक डॉ. एम. पी. रथ व सिल्वर ओक विद्यापीठ गुजरात चे डॉ. समीर गोपालन आणि अदिस अबाबा आफ्रिका येथील सिविल सर्व्हिसेस विद्याथी नचे डॉ. डेरी. बे. अगा या सर्वानी माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण,विविध विषयांवर आपली संशोधना-त्मक मते व्यक्त केली माहिती दिली. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. दुर्गेश वळवी, प्रा.स्नेह नागांवकर यांनी केले.