Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंडल अधिकाऱ्याला २७ हजाराची लाच घेताना अटकमहाविकास आघाडी की स्वतंत्र ? शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी निर्णय, अरुण दुधवडकर करणार सतेज पाटलांशी चर्चाशिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरू, २७ जानेवारीपर्यंत मागविले अर्ज राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ४९ नगरसेवकांची  निर्दोष मुक्तताइंडिया आघाडीतून आप बाहेर, महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारामहापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात निश्चित , कोल्हापूर- इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणून लढणार : सतेज पाटील संगीता पोवार चालविणार पोवार कुटुंबीयांचा समाजकार्याचा वारसा निकालानंतर कागलात वादाचे फटाके, मंडलिक-मुश्रीफ आमनेसामने !कोल्हापूरच्या चित्रकारांच्या कलाकृतीचे मुंबईत प्रदर्शनतुटलेली दोरी पुन्हा बांधता येते, मुश्रीफ यांच्या विधानावर सतेज पाटलांचे मिश्किल उत्तर

जाहिरात

 

जिल्ह्यात अडीच लाखाहून अधिक मूर्ती संकलित, पाचशे टन निर्माल्य जमा

schedule05 Sep 22 person by visibility 1172 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : विसर्जित मूर्ती दान व निर्माल्य दान उपक्रमाला यंदाही जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. भाविकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवच साजरा करत बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत एकूण दोन लाख ५८ हजार ९३२ मूर्ती संकलित झाल्या तर ५१६ टन निर्माल्यचे संकलन झाले आहे, असे जिल्हा परिषदेने कळविले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांतर्गत १९८६ गणेशमूर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होता. या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेतला.
या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले होते.
या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून उपक्रमाचे नियोजन केले होते. उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग व ग्राम पंचायत स्तरावर पर्यायी व्यवस्थांची निर्मिती करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना समन्वयासाठी जबाबदारी सोपविल्या होत्या. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाचे आयोजन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes