Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुनर्विचार याचिकेसाठी सरकारवर वाढता दबाव, शिक्षक संघटना सरसावल्या ! मंत्री- आमदार –खासदारांना पत्रे !!टीईटीसंबंधी दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक, धैयशील मानेंनी घेतली दादा भुसेंची भेटशिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची स्थापना ! अध्यक्षपदी डॉ. निखिल गायकवाड, उपाध्यक्षपदी सुजाता कुलकर्णी !!९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटीलबाजार समितीत शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण ! शेतमालासाठी कोल्डस्टोरेज, व्यापाऱ्यांसाठी दुकाने गाळे !!वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा महोत्सवात चॅम्पियनशिवाजी विद्यापीठामध्ये ऑनलाईन एमबीए,  विद्यार्थ्यांच्या करियरसाठी सुवर्णसंधी दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला-डॉ. राजन गवसटीईटीचा विषय ऐरणीवर, शिक्षक संघाने घेतली खासदारांची भेटशिक्षकांच्याकडून तुळशीचा हार घालून धनंजय महाडिकांचा सत्कार

जाहिरात

 

गणेशोत्सव महाप्रसाद कार्यक्रमात गोळीबार, करवीर तालुक्यातील प्रकार

schedule03 Sep 22 person by visibility 1136 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
गणेशोत्सवातील महाप्रसाद कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी पंगतीला पाणी सोडण्याच्या कारणावरुन करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन गटात वादावादी झाली. वादावादी वाढत जाउन गोळीबाराचा प्रकारही घडला. यातून दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत चौघे जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी बारा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई सुरू केली आहे.
मांडरे गावात हनुमान तरुण मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते. शुक्रवारी रात्री महाप्रसादाच्या कार्यक्रमात पहिली पंगत बसली. जेवण सुरू करण्यापूर्वी पाणी सोडण्याचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात ज्या व्यक्तीला मान असतो त्या व्यक्ती ऐवजी दुसरी व्यक्ती पाणी सोडत असताना एका गटाने आक्षेप घेतला. त्यातून वादावादी सुरू झाली. अभिजीत सुरेश पाटील याने त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नसतानाही बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला. यावळी उदय सोनबा पाटील हा बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला. त्यातून दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटात मोठी मारामारी झाली. दगड, काठ्यांचा वापर झाला. त्यामध्ये उदय सोनबा पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले.
 करवीर पोलिसांना गोळीबाराची माहिती कळताच त्यांनी तातडीने गावाकडे धाव घेतली. पोलिसांनी संशयीतांची धरपकड सुरू केली. त्यामध्ये अभिजीत सुरेश पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील , विकास बाजीराव पाटील, दादासो श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहुल कृष्णा पाटील, तुषार राजाराम पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयीतांना अटक केली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes