+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule15 Aug 24 person by visibility 751 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
 अडीच महिन्यापूर्वी आईचे निधन झालेले. आईच्या पश्चात भाऊ-बहिण दोघेच. दोघांचा एकमेकाला आधार. पण आईच्या निधनाचा विरह त्या भावडांना सहन झाला नाही. त्या दोघांनी राजाराम तलावात उडी टाकून जीवनयात्रा संपविली. पंधरा ऑगस्ट, गुरुवारी हा प्रकार समोर आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१ वर्षे) आणि भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (वय ५७ वर्षे) यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना साऱ्यांच्याच मनाला चटका लावणारी ठरली.
राजारामपुरी पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी, ‘भूषण आणि भाग्यश्री कुलकर्णी हे भाऊ-बहिण जुनी मोरे कॉलनी नाळे कॉलनी येथे राहावायस होते. अडीच महिन्यापूर्वी त्यांच्या आई पद्मजा यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर हे दोघे बहिण-भाऊ नैराश्यात होते असे पोलिस तपासात पुढे आले आहे. आईच्या निधनाचा विरह त्या भावडांना सहन झाला नाही. नैराश्यातून त्या दोघांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
 गुरुवारी, सकाळी त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. नागरिकांनी त्यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्या भावडांची नावे आहेत. आईच्या निधनामुळे आलेले नैराश्य व विरह सहन न झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटल्याचे समजते. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह तपासणीसाठी सीपीआरला पाठविले.’