प्रज्ञाशोध परिक्षेत २६ विद्यार्थी बक्षीस पात्र
schedule26 Mar 25 person by visibility 253 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषेदच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर मिळून एकूण २६ विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आहे.
बक्षीसास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वानंदी पाटील, स्वयंभू तेली, मनस्वी अलंकार, ओवी पाटील, सागरिका भोगम, ओमराजे कदम, राजवीर चौगले, पीयुष पाटील, प्रत्युष पाटील, प्रगती लगारे, राधिका पाटील, वेदिका भोसले, श्रेयान वागरे, विभावरी पाटील, मनाली पाटील, राजवीर महेकर, अनुष्का पाटील, आदेश पाटील, अर्णव गावडे, पूर्वा माळवेकर, अब्दुर्रहमान पटेल, अब्दुला जमादार, अलीना पटेल, मुहम्मद अनस शेख, मिसबा काझी, अन्सीबा मुल्लानी यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा झाली होती. पहिल्यांदा चाळणी परीक्षा झाली. या परीक्षेला एकूण ४४ हजार ९८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विद्यार्थ्यामधून गुणानुक्रमे मराठी माध्यमातील इयत्ता चौथीसाठी प्रत्येक तालुक्यातून २०० आणि सातवीसााठी शंभर विद्यार्थी निवडले. उर्दू माध्यमातील चौथी आणि सातवीसाठी प्रत्येक शंभर विद्यार्थी निवडले. एकूण ३८७९ विद्यार्थ्यांची परीक्षा नऊ मार्च रोजी घेण्यात आली होती.
हमिदवाडा कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीसाठी
schedule22 May 23 person by visibility 502 category
समरजित घाटगे हे पाऊस माझ्यामुळेच पडला म्हणतील मंडलिक गटाची बोचरी टीका
schedule26 Aug 22 person by visibility 678 category