गोकुळची बदनामी थांबवा यासाठी आत्मक्लेश आंदोलन
schedule08 Jul 26 person by visibility 6 category
गोकुळ च्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी
कोल्हापूर -जिल्हयातील शेतकरी परिवराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ ची निवडणुक पार्श्वभूमी वर सुरु असलेली बदनामी त्वरित थांबवावी यासाठी आत्मक्लेश आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात भर पावसात झाले . यामध्ये पंचवीस वर्षेतील शेतकरी कष्टकरी आणि महिलांचा उस्फूर्त सहभाग हा सर्वांसाठी लक्षवेधी ठरला .
या आंदोलन विषयी आपली भूमिका विशद करताना डॉक्टर युवराज येडुरे म्हणाले की ' लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे भविष्यातील होऊ नये यासाठी सत्ताधारी विरोधकांनी खबरदारी घ्यावी यासाठीच आपण हे आंदोलन करत असो यास मिळालेला हा प्रतिसाद सर्वांनाच एक चपराक आहे असे परखड मत त्यांनी नोंदवले . या आंदोलनात भुदरगड कागल राधानगरी परिसरातील धारवाड मसवी सावर्डे पांढरे पाणी अमित वाडा मोरेवाडी वाघापूर गोडशी ईस्पुली चक्रेश्वरवाडी नांदवली सांगाव भुदरगड शेगाव सह पंचक्रोशीतील शेतकरी महिला तसेच विविध सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . सायंकाळी या आंदोलनाची दूध पिऊन सांगता करण्यात आली यानंतर गोकुळ मुख्यालयात अनुरा पाटील आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापक शिष्टमंडळाद्वारे आपले मागणीचे निवेदन प्रदीप बालगाव योगेश गोडगे सागर मलकवडे यांना संयुक्तपणे सादर केले . आगामी पंधरा दिवसात आपल्या मागण्यावर सकारात्मक कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करून असेही युवराज घडवले यांनी सांगितले . आपल्या मागणी निवेदनात त्यांनी गोकुळचे प्रचार दरम्यान विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधकांनी सत्ताधारी यांच्यावर परत कायदेशीर कारवाई करावी ठराव आणि त्यासाठी दबाव तंत्र आणि कोट्यावधीचा होत असलेला व्यवहार याविषयी कारवाई करावी गोकुळची स्वायत्तता पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रित कार्यपद्धती आबादराजेत राहण्यासाठी शासनाने स्वतंत्र संरक्षणात्मक धोरण करावे आणि आगामी निवडणुकीत सर्व सभासदांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासह विविध मागणीचे निवेदन त्यांनी यावेळी सादर केले . भर पावसात झालेले आंदोलन आगामी गोकुळच्या प्रचाराच्या आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच केंद्रस्थानी राहणार आहे .
कोल्हापूर -जिल्हयातील शेतकरी परिवराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ ची निवडणुक पार्श्वभूमी वर सुरु असलेली बदनामी त्वरित थांबवावी यासाठी आत्मक्लेश आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात भर पावसात झाले . यामध्ये पंचवीस वर्षेतील शेतकरी कष्टकरी आणि महिलांचा उस्फूर्त सहभाग हा सर्वांसाठी लक्षवेधी ठरला .
या आंदोलन विषयी आपली भूमिका विशद करताना डॉक्टर युवराज येडुरे म्हणाले की ' लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे भविष्यातील होऊ नये यासाठी सत्ताधारी विरोधकांनी खबरदारी घ्यावी यासाठीच आपण हे आंदोलन करत असो यास मिळालेला हा प्रतिसाद सर्वांनाच एक चपराक आहे असे परखड मत त्यांनी नोंदवले . या आंदोलनात भुदरगड कागल राधानगरी परिसरातील धारवाड मसवी सावर्डे पांढरे पाणी अमित वाडा मोरेवाडी वाघापूर गोडशी ईस्पुली चक्रेश्वरवाडी नांदवली सांगाव भुदरगड शेगाव सह पंचक्रोशीतील शेतकरी महिला तसेच विविध सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . सायंकाळी या आंदोलनाची दूध पिऊन सांगता करण्यात आली यानंतर गोकुळ मुख्यालयात अनुरा पाटील आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापक शिष्टमंडळाद्वारे आपले मागणीचे निवेदन प्रदीप बालगाव योगेश गोडगे सागर मलकवडे यांना संयुक्तपणे सादर केले . आगामी पंधरा दिवसात आपल्या मागण्यावर सकारात्मक कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करून असेही युवराज घडवले यांनी सांगितले . आपल्या मागणी निवेदनात त्यांनी गोकुळचे प्रचार दरम्यान विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधकांनी सत्ताधारी यांच्यावर परत कायदेशीर कारवाई करावी ठराव आणि त्यासाठी दबाव तंत्र आणि कोट्यावधीचा होत असलेला व्यवहार याविषयी कारवाई करावी गोकुळची स्वायत्तता पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रित कार्यपद्धती आबादराजेत राहण्यासाठी शासनाने स्वतंत्र संरक्षणात्मक धोरण करावे आणि आगामी निवडणुकीत सर्व सभासदांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासह विविध मागणीचे निवेदन त्यांनी यावेळी सादर केले . भर पावसात झालेले आंदोलन आगामी गोकुळच्या प्रचाराच्या आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच केंद्रस्थानी राहणार आहे .
राहुल पाटील यांचा विजय निश्चित - डॉ चेतन नरके
schedule07 Nov 24 person by visibility 480 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
स्वर्गीय आमदार पी एन पाटील हे करवीर मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार होते .अरुण नरके व स्वर्गीय पी एन पाटील यांच्या नसानसात निष्ठा ठासून भरलेली होती. त्या जोरावरच त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले.या मतदारसंघात राहुल पाटील व आम्ही हातात हात घालून काम करत असून महाविकास आघाडी चे कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी केले
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
अडचणीत सापडलेला आणि या परिसराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला धामणी प्रकल्प अडचणीतून बाहेर काढून त्याला निधी उपलब्ध करून देण्याचे काम पी एन पाटील यांनी केलेले आहे .राहुल पाटील हे नव्या विचाराचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांना उत्स्फूर्तपणे मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित आहे .मतदारांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना विलास पाटील यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघात विकास काय असतो हे दाखवून दिले .चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे लोकांना केवळ फसवण्याचे काम केलेले आहे .या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद केवळ राहुल पाटील यांच्याकडेच असून चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे केवळ भूल थापा लावण्याचे काम केलेले आहे .यावेळी पन्हाळ्यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.त्यामुळे पन्हाळा तालुक्यातून राहुल पाटील यांना निर्णायक व विजयी मताधिक्य देऊ असे सांगितले .
यावेळी बोलताना करवीर चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघ भकास केला असून कुंभी कारखाना ही कर्जाच्या खाईत लोटला आहे हेच त्यांचे कर्तृत्व आहे .पी एन पाटील हेच धामणी प्रकल्पाचे खरे खुरे शिल्पकार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचा धामणी प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आगामी काळात हा मतदार संघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी मी वचनबद्ध आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, हंबीरराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार,विलास पाटील कळे, रणजित पाटील,ज्ञानदेव कांबळे काटेभोगाव,यांची भाषणे झाली.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,संभाजी पाटील(तात्या),गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडेबाळासाहेब मोळे,सुरेश पाटील , एस के पाटील ,पी.डी.पाटील,,सुनील पाटील,माजी सभापती बंकट थोडगे ,रणजित पाटील,शंभूराजे पाटील,शंकर राबाडे,बापू गिरीबुवा,शामराव पाटील,तसेच ए.डी.पाटील),रघुनाथ आवळेकर,,सरदार पाटील,केरबा पाटील,डॉ कोल्हे,अनिल पोवार,संदीप टिक्के,शिवाजी पाटील,कृष्णनाथ कदम,सीताराम सातपुते,,युवराज पाटील(सर),निवास पाटील(सर),सतीश मोळे,बाजीराव पाटील,किरण पाटील, मनोज पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोज पाटील यांनी मानले
स्वर्गीय आमदार पी एन पाटील हे करवीर मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार होते .अरुण नरके व स्वर्गीय पी एन पाटील यांच्या नसानसात निष्ठा ठासून भरलेली होती. त्या जोरावरच त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले.या मतदारसंघात राहुल पाटील व आम्ही हातात हात घालून काम करत असून महाविकास आघाडी चे कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी केले
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
अडचणीत सापडलेला आणि या परिसराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला धामणी प्रकल्प अडचणीतून बाहेर काढून त्याला निधी उपलब्ध करून देण्याचे काम पी एन पाटील यांनी केलेले आहे .राहुल पाटील हे नव्या विचाराचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांना उत्स्फूर्तपणे मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित आहे .मतदारांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना विलास पाटील यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी अवघ्या पाच वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघात विकास काय असतो हे दाखवून दिले .चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे लोकांना केवळ फसवण्याचे काम केलेले आहे .या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद केवळ राहुल पाटील यांच्याकडेच असून चंद्रदीप नरके यांनी दहा वर्षे केवळ भूल थापा लावण्याचे काम केलेले आहे .यावेळी पन्हाळ्यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.त्यामुळे पन्हाळा तालुक्यातून राहुल पाटील यांना निर्णायक व विजयी मताधिक्य देऊ असे सांगितले .
यावेळी बोलताना करवीर चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघ भकास केला असून कुंभी कारखाना ही कर्जाच्या खाईत लोटला आहे हेच त्यांचे कर्तृत्व आहे .पी एन पाटील हेच धामणी प्रकल्पाचे खरे खुरे शिल्पकार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचा धामणी प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आगामी काळात हा मतदार संघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी मी वचनबद्ध आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, हंबीरराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार,विलास पाटील कळे, रणजित पाटील,ज्ञानदेव कांबळे काटेभोगाव,यांची भाषणे झाली.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,संभाजी पाटील(तात्या),गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडेबाळासाहेब मोळे,सुरेश पाटील , एस के पाटील ,पी.डी.पाटील,,सुनील पाटील,माजी सभापती बंकट थोडगे ,रणजित पाटील,शंभूराजे पाटील,शंकर राबाडे,बापू गिरीबुवा,शामराव पाटील,तसेच ए.डी.पाटील),रघुनाथ आवळेकर,,सरदार पाटील,केरबा पाटील,डॉ कोल्हे,अनिल पोवार,संदीप टिक्के,शिवाजी पाटील,कृष्णनाथ कदम,सीताराम सातपुते,,युवराज पाटील(सर),निवास पाटील(सर),सतीश मोळे,बाजीराव पाटील,किरण पाटील, मनोज पाटील,पांडुरंग जाधव यांच्यासह मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मनोज पाटील यांनी मानले