Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बंड शमले, अरुण डोंगळेंचा राजीनामा, नेतेमंडळींची सरशी ! शिवसेना महानगर समन्वयकपदी कमलाकर जगदाळेनाळ कोल्हापूरच्या मातीशी जुळलेली…नाते जडलेले आकाशाशी !अलमट्टीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक, महाविकासच्या खासदार-आमदारांना ठेवले बैठकीपासून लांब !  सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा !!सामाजिक उपक्रमांनी किशोर घाटगेंचा वाढदिवस साजराभारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेतर्फे तिरंगा पदयात्रागोकुळतर्फे  स्मार्ट वजन काटे-साहित्याचे वाटपराजकारण्यांना सत्ता-फायद्याच्या विषयात इंटरेस्ट, हद्दवाढीचे देणेघेणे नाही –कृती समितीचा आरोपबिल्डर लॉबीसाठी हद्दवाढीचा उद्योग - विरोधी कृती समितीचा आरोपयंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच ! विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेऊ नये !!

जाहिरात

 

तीन टर्म आमदार, विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलल्या,पालकमंत्रीपद आम्हाला मिळावे- राजेश क्षीरसागर

schedule28 Nov 24 person by visibility 591 categoryराजकीयसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आमदारकीची माझी ही तिसरी टर्म आहे. गेली पाच वर्षे माझी राज्य  नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या मंत्रीपदाच्या दर्जाचा  कार्यभार मी व्यवस्थित सांभाळला आहे. यासह मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून  शाश्वत परिषदेसारख्या  संकल्पनांद्वारे  कोल्हापूर जिल्ह्यात  विकासाची नवी वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पालकमंत्री पद आम्हाला मिळावे यासाठी आग्रही आहे.’अशी भूमिका आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडली आहे.

क्षीरसागर यांनी म्ह्टले आहे, ‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत  काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला , त्यामुळे महायुतीचा विजय झाला.  शिंदे यांनी मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग आणखी सुखकर झाला आहे.शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील अशी खात्री आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासूनचा मी कार्यकर्ता, बाकीचे आता आलेली आहेत. मी केडरमधील कार्यकर्ता , त्यामुळे मला मंत्रिपद मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

१० पैकी १० जागा महायुतीच्या येणार हे मी आधी पासून म्हणत होतो. लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले एकत्र आल्यावर हिंदू काय करू शकतो. अंबादास दानवे यांच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेण्याची गरज नाही.. त्यांनी स्वतःची माती करून घेतलीय.. शिवसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा असलेले आमदार आहेत.ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे याकडेही क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes