भागीरथी महिला संस्थेने बांधला पोलिस कर्मचाऱ्यांना स्नेहबंधाचा धागा
schedule07 Aug 25 person by visibility 52 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जनसेवेसाठी सक्रीय असलेल्या आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राबणार्या, पोलिस कर्मचार्यांबद्दल स्नेह आणि कृतज्ञता म्हणून भागीरथी संस्थेच्यावतीने, रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील पाच पोलिस ठाण्यासह गांधीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना, भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी स्नेहधागा बांधला. त्यानंतर दक्षता कमिटी सदस्यांची बैठक झाली.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांचे ऐश्वर्या देसाई, अश्विनी वास्कर, सरीता हारुगले, गिता काटवे, रोहिणी मेथे, स्नेहा केनभावी, राधा मेस्त्री, रेखा केसरकर, सरोज फडके, संगीता सातपुते यांनी औक्षण केले आणि त्यांना राखी बांधली. तर देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे, शरयु भोसले, पूजा सन्नके, अश्विनी पंडत, राजेश्वरी मोटे, रंजना शिर्के, अर्चना मेढे, शारदा पोटे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना राखीचा धागा बांधला. लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात, शिवानी पाटील, चांदणी कांबळे, ज्योती धावारे, माधुरी शिंदे, अश्विनी पाटील, राधिका पाटील यांनी राखी बांधली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड, हवालदार एकनाथ कळंत्रे यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात दक्षता कमिटीची बैठक झाली.
राजारामपूरी पोलिस ठाण्यातही भागीरथी संस्थेच्या भाग्यश्री शितोळे, सिमा पालकर, स्मिता चव्हाण, रंजना रणवरे, शितल तिरूखे, राणी खर्पे, स्मिता चव्हाण यांनी पोलिसांना राखी बांधत स्नेह जपला. करवीर पोलिस ठाण्यात भागीरथी संस्थेच्या सुनिता कोळी, रंजना येडगे, श्वेता कदम, रूपाली कुंभार, शोभा कोळी, सुषमा पाटील, सविता कोळी यांनी पोलिस कर्मचार्यांना राखी बांधली. दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्यातही भागीरथीच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते प्रस्थापित केले. सुलोचना नार्वेकर, हेमलता माने, वनिता खत्री, रूपा काळे, चिगूताई तहसीलदार, पद्मा सावंत, विद्या माळी, चांदणी पिंजारी, शिल्पा पाटील, पूजा कांबळे, भाग्यश्री साळुंखे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना राखी बांधली. यावेळी कामानिमित्त गांधीनगरमध्ये आलेल्या कर्नाटक राज्यातील दोन पोलिस कर्मचार्यांनाही राखी बांधण्यात आली.