Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारघाटगे ग्रुपतर्फे वसंतराव घाटगेंची जयंती उत्साहात, कंपन्यांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव !उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

जाहिरात

 

महाराणी ताराराणी समाधीस्थळावरुन शिवसेना ठाकरे गटाचा सरकारला अल्टिमेटम

schedule20 Apr 25 person by visibility 101 categoryसामाजिक

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार येत्या वर्षभरात करा, अन्यथा या समाधीस्थळाचे जीर्णोद्धार शिवसेनेतर्फे  लोकसहभागातून करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना इंगवले म्हणाले, ‘महाराणी ताराराणी या करवीर संस्थापिका आहेत. त्या कोल्हापूरच्या रणरागिणी आहेत. त्यांच्या समाधीकडे दुर्लक्ष होत आहे, शिवसेना ठाकरे गट हे कदापि खपवून घेणार नाही. महायतुी सरकारने या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार का केला नाही ? हा मूळ प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन राज्य सरकारने सत्ता मिळवली. या सरकारच्या कालावधीत राष्ट्रपुरुषांचा अपमान होईल असे शब्द वापरले जात आहेत. महाराणी ताराराणी समाधीस्थळाकडेही त्यांनी पाठ फिरवली.

महाराणी ताराराणी यांनी अठरापगड जातींना सोबतीला घेऊन औरंगजेबाला महाराष्ट्रातच नेस्तनाबूत केले. समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी शिवप्रेमींनी वारंवार केली आहे. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. जर राज्य सरकार या समाधीचा जीर्णोद्धार येत्या वर्षभरात केले नाही तर कोल्हापूर शहर शिवसेनेतर्फे लोकसहभागातून जीर्णोद्धार केले जाईल.’असे इंगवले म्हणाले. पत्रकार परिषदेला शहरप्रमुख सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, शशी बिडकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes