शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; इंडिया आघाडीची मागणी
schedule28 May 25 person by visibility 50 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे. अवकाळी पावसामुळ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
खासदार शाहू महाराज आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेतली. यावेळी मागण्यांचे जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीसह इतर क्षेत्रांमध्ये नुकसान झाले. या पावसामुळे शेतमालांचे, घरे, जनावरे तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक वाया गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी. त्याचबरोबर राज्य शासनाने अवकाळी पावसाला 'राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक अनुदानाच्या दहा टक्केपर्यंत निधीचा वापर करून अशा आपत्तीमधील बाधित नागरिकांना तात्काळ मदत पुरविणे शक्य आहे. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, शेतकऱ्यांच मोठ नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत. केवळ राजकारणावर चर्चा होतात. विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची भूमिका आम्ही मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार शाहू महाराज यांनी, पडझड झालेल्या घरांची त्याचबरोबर शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना केली. शिष्टमंडळामध्ये, माजी आमदार राजूबाबा आवळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, संपर्कप्रमुख विजय देवणे, आर के पोवार, महादेवराव आडगुळे, दिलीप पवार, संदीप देसाई, सुनील मोदी, क्रांतिसिंह पवार, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, अतुल दिघे, अनिल घाटगे, सुनिल देसाई, बाजीराव पाटील उपस्थित होते.