अजिंक्यतारा कार्यालयात संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
schedule28 May 25 person by visibility 112 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अनेक योजना आणून काँग्रेस पक्षाने गोरगरिबांना आधार देण्याचं काम केले. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही काही योजनांच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू. अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा 31 मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच औचित्य साधून, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील 100 लाभार्थ्यांना योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अजिंक्यतारा कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद मला प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीचे सरकार नसले तरी योजनेच्या रक्केमत वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी करु. अशी ग्वाही दिली. शरद सोनुर्ले यांनी, आमदार सतेज पाटील पालकमंत्री असताना त्यांच्यामुळे जिल्हयातील अनेक गोरगरिबांना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला.
दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष मयूर पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केल. दरम्यान यावेळी, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि मयूर पाटील यांचा वाढदिवस, योजनेतील वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, राजू साबळे, रियाज सुभेदार, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय शेळके, उमेश पाडळकर, आशिष पाटील, मुस्ताक मलबारी, दस्तगीर शेख, विश्वविक्रम कांबळे आदी उपस्थित होते.