Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

थुई थुई आभाळमधील कविता लहानमुलांचे बालविश्व समृद्ध करणारी

schedule16 Jul 22 person by visibility 1007 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी : 'रुढ प्रकारच्या बालकवितेपेक्षा 'थुई थुई आभाळ' या बालकवितासंग्रहातील कविता वेगळ्या धाटणीच्या आहेत. कवी गोविंद पाटील यांच्या ल कविता लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी आहे. कवितांमधून बालमनाचा अत्यंत सूक्ष्मपणे भावाविष्कार मांडला आहे .' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील समीक्षक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.
सृजन प्रकाशन, शब्दसाहित्य विचारमंच आणि संवाद वाचन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली हायस्कूल येथे कवी गोविंद पाटील यांच्या 'थुई थुई आभाळ' या बालकवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ झाला. बालसाहित्यिक गौतम पाटील याच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.
 प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. मोरे यांनी कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये नमूद केली. ‘थुई थुई आभाळ’मधील कवितांना गावमातीचा स्पर्श आहे. तिच्यामध्ये जिवंतपणा आहे. पारंपारिक बालकवितेपेक्षा तिचे आशयविश्व वेगळे आणि विज्ञाननिष्ठ आहेत. हा संग्रह मुलांना चौकस आणि विचारप्रवण बनवणारा आहे.’असे मोरे यांनी सांगितले.
यावेळी कवी गोविंद पाटील यांनी आपली कवी म्हणून झालेली जडणघडण आणि या बालकवितासंग्रहाच्या लेखनामागची भूमिका विशद केली.
याप्रसंगी हर्षल पाटील, श्रीवर्धन पाटोळे यांनी या कवितासंग्रहाविषयी मनोगते व्यक्त केली. संग्रहातील निवडक कवितांचे प्रकट वाचनही केले.
यावेळी साहित्यिक नामदेव माळी, संवाद ग्रुपच्या अर्चना मुळे, दमसाचे भिमराव धुळूबुळू, नामदेव भोसले, मनोहर भोसले, वर्षा चौगुले, डॉ. तेजस चव्हाण, कवी सुरेश मोहिते, कृष्णात पाटोळे आणि समडोळी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह सांगली हायस्कूलचे विद्यार्थी, आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शब्दसाहित्य मंचचे अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक चोपडे यांनी आभार मानले. ईश्वरी हिरेमठ या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes