स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक
schedule31 May 25 person by visibility 60 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील पंधरा दिवसांत तालुकास्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत काम करावे असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.
अजिंक्यतारा येथे घेतलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत मार्गदर्शन त्यांनी मार्गदर्शन केले. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, निवडणुका या लोकशाहीतील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन लढवूया. कोणतेही हेवे दावे न ठेवता,भांडण तंटा न करता एकमेकांमध्ये समन्वय ठेवून लढवूया आणि जिंकूया.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत काम करावे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, बाबासो देवकर, भारती पोवार, सुभाष जाधव, अनिल लव्हेकर अशा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, वसंत पाटील, उदय नारकर, बाळासाहेब सरनाईक, अनिल घाटगे, डी.जी. भास्कर, व्यंकाप्पा भोसले, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडी, तौफीक मुल्लाणी, विशाल देवकुळे, सुनिल देसाई आदी उपस्थित होते.