आषाढी वारीत रंगले संभाजीराजे ! युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजेही सहभागी !!
schedule13 Jul 26 person by visibility 27 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारीची महाराष्ट्राला मोठी परंपरा. वारकरी संप्रदायाचे अखंड श्रद्धेचे प्रतिक म्हणजे वारी. दरवर्षी आषाढी वारीत लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत पंढरीकडे मार्गस्थ होते. या वारीत संत तुकाराम पालखी सोहळा वारकऱ्यांचा श्रद्धेचा आणि जिव्हाळयाचा. यंदाच्या आषाढी पालखी सोहळयात युवराज संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराज आणि यौवराज शहाजीराजे छत्रपती सहभागी झाले. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. वारकऱ्यांच्यामध्ये सहभागी होऊन फेर धरला.
संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळा देहू येथून झाला. पालखी प्रस्थान सोहळा हा अतिशय भक्तीमय वातावरणात झाला. श्रद्धेचे प्रतिक असलेल्या श्री जगद्गगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान पूजनासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्यावतीने संभाजीराजे छत्रपती यांना सपत्नीक आमंत्रित केले होते. याप्रसंगी यौवराज शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पालखी पूजन व स्वराज्याचा भगवा ध्वज अर्पण करण्यात आला. पुणे येथेही त्यांनीही वारीत सहभाग घेतला.‘आषाढी वारीतील सहभाग, पालखी पूजनाचा सन्मान हा आमच्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता.’अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.