Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतींना सूचना, पिण्याच्या पाण्याचे दैनंदिन शुद्धिकरण करा इरिगेशन फेडरेशनच्या अध्यक्षपदी विक्रांत पाटील, उपाध्यक्षपदी सुभाष शहापुरेएमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या ४७ व्या राज्यव्यापी अधिवेशनचे थाटात उद्घाटनबाबा देसाईंच्या स्नेहधाग्यांनी सर्वपक्षीय एकवटले, शोकसभेत आठवणींनी गहिवरलेगोल्ड क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातील सुवर्ण उद्योगाला नवी झळाळी - आमदार अमल महाडिकविद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – शिक्षणाधिकारी मीना शेंडकरकोल्हापूर-नागपूर विमानसेवा पंधरा मेपासून ! आठवडयातील पाच दिवस विमानाचे उड्डाण !!बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांची रविवारी प्रकट मुलाखतसकल ब्राह्मण समाजातर्फे यंदा परशुराम जन्मोत्सव, शिवजयंती  साधेपणाने सेवानिवृत्तीनिमित्त प्राचार्य एस. एस. चव्हाण यांचा रविवारी गौरव समारंभ

जाहिरात

 

पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सहकार दरबार

schedule23 Apr 25 person by visibility 139 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात १०० दिवसांच्या विशेष मोहिमेतंर्गत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता  महाराणी ताराराणी सभागृह, कोल्हापूर येथे सहकार दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांबाबत ज्यांच्या अडचणी व प्रलंबित कामे असतील त्यांनी https://tinyurl.com/Sahakar-darbar या संकेतस्थळावर दि.२६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले अर्ज दाखल करावेत.

 ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी सहकार विभागाच्या संबंधित तालुका अथवा जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सहकार भवन, कोल्हापूर कार्यालयात २६ एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या १३ हजार पेक्षा जास्त सहकारी संस्था असून, जिल्ह्यातील सहकार चळवळीची व्याप्ती पाहता सहकार पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो.  सहकारी संस्थांच्या माध्यमातून सभासदांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देवून सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य सहकार चळवळीतून होत आहे. सहकारी चळवळीमध्ये वाढत्या सहकारी संस्थांबरोबरच सभासदांच्या तक्रारीची संख्या व न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. सभासदांच्या तक्रारींचे निरसन वेळेत होणे तसेच तक्रारदार व संस्थांच्या समस्यांचा जलद गतीने निपटारा होणे आवश्यक आहे. सहकार दरबारमध्ये प्राप्त होणा-या अर्जाबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes