एकटे पडलो विधानावरून धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांच्यावर खोचक टीका ! आम्ही ना गाव सोडलं - ना टीव्ही फोडलं, विधानपरिषदेला भाजपचा आमदार असेल !!
schedule16 Jun 25 person by visibility 735 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " राजकारण हे कालचक्रासारखे असते. चढ-उतार येत असतात. आमच्याही राजकीय वाटचालीत चढ-उतार आले. आम्ही संघर्ष केला. अपयशाने खचलो नाही. निराश झालो नाही. लोकांची साथ मिळत गेली. मात्र अपयश आले म्हणून मी एकटा पडलो, असे कधी जाहीरपणे आम्ही सांगितले नाही. गाव सोडून गेलो नाही. टीव्ही फोडला नाही." अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी नाव न घेता विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
नागाळा पार्कातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत गोकुळ मधील अध्यक्ष निवड, ककाँग्रेसच्या माजी नगरसेवकांचे इतर पक्षात पक्षप्रवेश, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारले खासदार महाडिक म्हणाले, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत मी सहभागी नाही. मात्र महायुतीचा अध्यक्ष हवा अशी प्रांजळ भावना मी व्यक्त केली होती आणि त्या पद्धतीने घडत गेले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकावा यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे लढत आहोत. इतर पक्षातील काही जण शिवसेनेत जात आहेत कोण राष्ट्रवादी अजित पवार गटात जात आहेत भाजपमध्येही अनेक जण प्रवेशाच्या मार्गावर आहेत. मात्र भाजपमध्ये प्रवेश देताना सगळ्या बाबी विचारात घेऊन निर्णय होतो. ज्या त्या प्रभागात गेली अनेक वर्ष तयारी करत असलेला भाजपचा कार्यकर्ता दुखावणार नाही याची काळजी घेतली जाते.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी चंदगड दौऱ्यात राजकारणात मी एकटा पडलो आहे जनतेने साथ द्यावी असे साद घातली होती. त्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता खासदार महाडिक म्हणाले, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र राजकारणात चढउतार येत असतात. राजकारण कालचक्रासारखे असते. आमच्याही राजकीय वाटचालीत अनेक चढ-उतार आले अपयश आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माझा घात झाला. विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाला. गोकुळ मधील सत्ता गेली.
मात्र अपयशाने खचलो नाही.लढत राहिलो, संघर्ष केला. राजकारणात हरलो म्हणून आम्ही कधी गाव सोडले नाहीत टीव्ही फोडला नाही. गोकुळ मधील अध्यक्षा 100 टक्के महायुतीचाच आहे. आगामी काळात गोकुळची सत्ता ही महायुतीकडे असेल आणि विधान परिषदेचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असेल.पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, आणि किसान सेलचे भगवान काटे उपस्थित होते.
नागाळा पार्कातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत गोकुळ मधील अध्यक्ष निवड, ककाँग्रेसच्या माजी नगरसेवकांचे इतर पक्षात पक्षप्रवेश, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारले खासदार महाडिक म्हणाले, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत मी सहभागी नाही. मात्र महायुतीचा अध्यक्ष हवा अशी प्रांजळ भावना मी व्यक्त केली होती आणि त्या पद्धतीने घडत गेले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकावा यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे लढत आहोत. इतर पक्षातील काही जण शिवसेनेत जात आहेत कोण राष्ट्रवादी अजित पवार गटात जात आहेत भाजपमध्येही अनेक जण प्रवेशाच्या मार्गावर आहेत. मात्र भाजपमध्ये प्रवेश देताना सगळ्या बाबी विचारात घेऊन निर्णय होतो. ज्या त्या प्रभागात गेली अनेक वर्ष तयारी करत असलेला भाजपचा कार्यकर्ता दुखावणार नाही याची काळजी घेतली जाते.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी चंदगड दौऱ्यात राजकारणात मी एकटा पडलो आहे जनतेने साथ द्यावी असे साद घातली होती. त्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता खासदार महाडिक म्हणाले, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र राजकारणात चढउतार येत असतात. राजकारण कालचक्रासारखे असते. आमच्याही राजकीय वाटचालीत अनेक चढ-उतार आले अपयश आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माझा घात झाला. विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाला. गोकुळ मधील सत्ता गेली.
मात्र अपयशाने खचलो नाही.लढत राहिलो, संघर्ष केला. राजकारणात हरलो म्हणून आम्ही कधी गाव सोडले नाहीत टीव्ही फोडला नाही. गोकुळ मधील अध्यक्षा 100 टक्के महायुतीचाच आहे. आगामी काळात गोकुळची सत्ता ही महायुतीकडे असेल आणि विधान परिषदेचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असेल.पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, आणि किसान सेलचे भगवान काटे उपस्थित होते.