Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढ तत ततकोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना निश्चित होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजिपतील बदल्या…प्रशासनाकडून चित्रीकरणाद्वारे सुलभ प्रक्रिया !  बदल्यामध्ये अनियमितता झाल्याची लिपीक संघटनेची तक्रार !अनिल मेहता, अरुणा ढेरे यांना पुरस्कार ! प्रसाद प्रकाशनतर्फे पुण्यात वितरण समारंभ !!अलमट्टी धरणाच्या  उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, धनंजय महाडिकांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांची भेटकोल्हापूरच्या एसपींची बदली ! योगेश कुमार गुप्ता नवे पोलिस अधीक्षक !!जुन्या पेन्शनसाठी पडताळणीसह प्रस्ताव मागवून घ्या - भरत रसाळेप्लास्टिकचा राक्षस विद्यार्थ्यांनी केला  बाटलीत  बंद ! अलमट्टीसंदर्भात पंधरा दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक-जलसंपदामंत्री  राधाकृष्ण विखे पाटीलराष्ट्रीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभ

जाहिरात

 

काँग्रेस फक्त आश्वासन देते, पूर्तता करण्याची धमक त्यांच्याकडे नाही- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

schedule08 Nov 24 person by visibility 195 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतंर्गत महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. राजभरातील महिला महायुती सोबत आहेत. यामुळे अस्वस्थ होऊन काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची जी घोषणा केली आहे ती पूर्ण करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. कारण काँग्रेस फक्त आश्वासन देते, योजनांची पूर्तता करण्याची धमक त्यांच्याकडे नाही असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगावला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. कोल्हापुरात सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या खुंटलेल्या विकासाला काँग्रेसच्या नेतृत्वाला जबाबदार धरले. कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या भाजप व महायुतीकडे असायला हवे. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या कोल्हापूरच्या विकासाला शतपटीने गती मिळेल. महायुती सरकारने राज्यातील लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत. युवाशक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण, महिला कल्याण या सूत्रावर सरकार काम करत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत. निवडणुकीनंतर त्यामध्ये वाढ होऊन दर महिन्याला 2100 रुपये जमा होतील. महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरल्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आहे. ते आता महिन्याला तीन हजार रुपये देणार असे म्हणत आहेत. मात्र काँग्रेस केवळ आश्वासन देते. त्याची पूर्तता करण्याची धमक त्यांच्याकडे नाही.
येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या हाती सत्ता देईल असा विश्वास ही सावंत यांनी व्यक्त केला. तसेच 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपला मतदारांनी कौल दिला होता. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ खुर्चीसाठी लोकांचा कौल डावलला. भाजपशी फारकत घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला खोडा घातला. असे टीकास्त्र सावंत यांनी सोडले.
 पत्रकार परिषदेला कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉ. आनंद गुरव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes