Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना निश्चित होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजिपतील बदल्या…प्रशासनाकडून चित्रीकरणाद्वारे सुलभ प्रक्रिया !  बदल्यामध्ये अनियमितता झाल्याची लिपीक संघटनेची तक्रार !अनिल मेहता, अरुणा ढेरे यांना पुरस्कार ! प्रसाद प्रकाशनतर्फे पुण्यात वितरण समारंभ !!अलमट्टी धरणाच्या  उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, धनंजय महाडिकांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांची भेटकोल्हापूरच्या एसपींची बदली ! योगेश कुमार गुप्ता नवे पोलिस अधीक्षक !!जुन्या पेन्शनसाठी पडताळणीसह प्रस्ताव मागवून घ्या - भरत रसाळेप्लास्टिकचा राक्षस विद्यार्थ्यांनी केला  बाटलीत  बंद ! अलमट्टीसंदर्भात पंधरा दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक-जलसंपदामंत्री  राधाकृष्ण विखे पाटीलराष्ट्रीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभजिल्हा काँग्रेस कमिटीत राजीव गांधींना अभिवादन

जाहिरात

 

वीज कंत्राटी कामगारांचे राज्यभर साखळी उपोषण, सरकार लक्ष कधी देणार ?

schedule12 Aug 24 person by visibility 654 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघातर्फेे राज्यातील वीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे सोमवारपासून (१२ ऑगस्ट) साखळी उपोषण सुरू केले.
 वीज कंत्राटी कामगार लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहेत, सरकार लक्ष कधी देणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. ऊर्जांमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगाारांच्या मागण्यासंबंधी योग्य तोडगा काढावा. त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.  
वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी या साठी बारा ते १७ ऑगस्ट या कालावधीत साखळी उपोषण होणार आहे. कोल्हापूर मधील महावितरण कार्यालय,ताराबाई पार्क येथे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमर लोहार, झोन अध्यक्ष राहुल भालभर व सचिव मिलिंद कुडतरकर , अनिल लांडगे, विजय कांबळे, यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सूर झाले आहे.या साखळी उपोषणाला संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री उमेश आनेराव व महाराष्ट्र प्रदेश उपमहामंत्री राहुल बोडके यांनी भेट देऊन कोल्हापूर मधील कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच
कोल्हापूर झोनच्या उपोषणाला विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी पाठींबा दिला आहे. वीस ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन होणार आहे. २४ ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानपर्यंत पायी मोर्चा आहे. शिवाय त्यांच्या घरासमोर संघटनेचे केंद्रीय उपमहामंत्री राहुल बोडके व त्यांच्या सोबत काही जिल्हा प्रतिनिधी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes