Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंकाआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाहीअधिकारी बदलले, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला मुहूर्त लागेना ! सादरीकरणासाठी रोज नवीन तारीख ! !बीओटीतून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणीस विरोध, जीमच्या खासगीकरणाला ब्रेक !  मुख्यालयातील सुशोभिकरणाचा हिशेब  सदस्यांनी मांडला ! !

जाहिरात

 

आता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  

schedule14 Aug 26 person by visibility 20 categoryशैक्षणिकजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर   :   माहिती अधिकाराचीच माहिती नसल्याने मुख्याध्यापकांची अनेकदा त्रेधा उडत असते ही परिस्थिती लक्षात घेऊन माध्यमिक शिक्षण विभाग आणि यशदा, पुणे यांच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अनुषंगाने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा गडकरी हॉल येथे आयोजित करण्यात आली होती . या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १००० माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना माहितीचा अधिकार, त्याची अंमल बजावणी याबरोबरच प्रशासकीय कर्तव्याचे उत्तरदायित्व यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . यशदाचे संशोधन अधिकारी तथा मार्गदर्शिका  रेखा साळुंखे, मार्गदर्शक दादू बुले यांनी माहिती अधिकारातील माहिती तपासून तो निकालात कसा काढावा यासह जनमाहिती अधिकाऱ्याची भूमिका विषद केली. साळुंखे यांनी माहितीचा अधिकार हा मुलभूत अधिकार असून प्रत्येक नागरिकास कोणत्याही प्रकारची माहिती मागता येते . तो त्याचा हक्क आहे . एखादे परिपत्रक निघाले आणि त्याचा आधार घेऊन माहिती नाकारणे हा दंडनीय अपराध आहे . एखादे परिपत्रक मार्गदर्शक ठरू शकते मात्र ते कायद्याच्या पातळीवर टिकू  शकत नाही . माहिती देणे टाळण्यापेक्षा लोकहित लक्षात घेऊन माहिती देणे केंव्हाही चांगलेच असेही त्यांनी सांगितले. मार्गदर्शक दादू बुले यांनी सार्वजनिक प्राधिकरण कसे ओळखावे याबरोबरच सर्वसामान्य नागरिक हा व्यवस्थेचा मालक असून शाळा चालक हे विश्वस्त आहेत याची जाणिव करून देतानाच माहितीचा सांभाळ करणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्ज निकाली काढणे आणि अपीलाची प्रक्रिया यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रारंभी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापकांना सजग करतानाच विविध समित्यांची माहिती, सरल पोर्टलवरच्या नोंदी, सेल्फि विथ तिरंगा, युथ फर्स्ट मॅरेथॉन व त्यातील आभासी सहभाग तसेच विद्यांजली पोर्टलवरील विद्यार्थी उपस्थिती नोंद यासंदर्भात माहिती देतानाच माहिती अधिकाराचे प्रशिक्षण घेणा-या मुख्याध्यापकांना चिंता न करता गुंता कसा सोडवावा याचे मार्गदर्शन केले.  याप्रसंगी विनाअनुदान कृती समितीचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर . वाय. पाटील, मुख्याध्यापक प्रकाश सुतार, संजय सौंदलगे, धनाजी बेलेकर, सुरेखा पोवार, मनिषा पाटील, माधवी सौंदलगे, सुधाकर सातवेकर, विजय भोगम, पद्मिनी माने, अश्विनी पाटील  उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes