Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदलीकोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा ! प्रस्ताव सरकारकडे सादर ! !यसबा बाल मित्र पुरस्कार प्रा. प्रज्ञा गिरी, आशिष घेवडे यांना जाहीरशिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनआधुनिक तंत्रज्ञानाने आरोग्य सेवा दर्जेदार करणे ही काळाची गरज- डॉ.चंद्रशेखर बिरादरनूतन मराठीचा विद्यार्थी गौरव पाटीलला राष्ट्रीय शालेय कुस्तीमध्ये सुवर्णपदक

जाहिरात

 

रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी

schedule09 Dec 25 person by visibility 25 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मतदार यादीतील घोळा बाबत नागरिकांनी घेतलेल्या हरकतींसाठी  रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व अन्य रहिवास पुरावा महानगरपालिकेकडून मान्य केला जात नाही आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा कोणताही लेखी आदेश नसताना सूचनांचा चुकीचा अर्थ लावून महानगरपालिकेचे अधिकारी मतदान ओळखपत्रावरील पत्ताच ग्राह्य धरणार असे म्हणत आहेत. या भूमिकेमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या थेट आदेशांचे उल्लंघनही होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हरकतींसाठी मतदान ओळखपत्र व्यतिरिक्त आधार कार्ड व रेशनकार्ड असे रहिवासाचे अन्य पुरावे ग्राह्य धरावेत अशी आग्रही मागणी भाजपाच्या माजी नगरसेवकांनी प्रशासकीय मंजू लक्ष्मी यांचे कडे केली. तसे न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

हरकतींबाबत महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात 'रहिवासाचा पुरावा' हरकती सोबत देण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. नागरिकांच्या दृष्टीने केंद्र शासनाने वितरित केलेले आधार कार्ड , रेशन कार्ड  इ. पुरावे सादर करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या  उपरोक्त प्रसिद्ध पत्रकामध्ये कोठेही  पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र  देण्याचा अथवा मतदान  ओळखपत्र हाच पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा उल्लेख नाही. त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या मतदान ओळखपत्रावर पुरेसा पत्ता नाही, तर अनेकांकडे मतदान ओळखपत्रे  नाहीत सर्वात महत्वाचे म्हणजे मतदान ओळखपत्र वरील पत्ता ग्राह्य धरण्याचा निवडणूक आयोगाचा कोणतेही लेखी आदेश नाहीत. त्यामुळे  एखादी व्यक्ती ज्या प्रभागाच्या हद्दीत रहिवास करत असेल त्याच प्रभागाच्या मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट होणे आवश्यक आहे.  तसे न केल्यास व केवळ मतदान ओळखपत्र वरील पत्त्यामुळे त्यांचा रहिवास नसलेल्या भागांच्या मतदार यादीत त्यांची नावे समाविष्ट केल्यास तो निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग होईल. सबब अशा प्रकारच्या हरकतींमध्ये संबंधित नागरिकांचा नेहमीच रहिवासाचा पत्ता ग्राह्य धरूनच त्यांची नावे ज्या प्रभागाचे हद्दीत त्यांच्या नियमित रहिवास आहे. अशा यादीत समाविष्ट करावी अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, स्वाती कदम, सुनीता लोकरे, अमित टिकले हे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes