Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शरद पवारांनी टोचले साखर कारखानदारांचे कान, कारखान्यांनी कामगारांचे  ६०० कोटी थकवलेशिक्षक रवींद्र केदार, मुख्याध्यापक दत्तात्रय घुगरे यांना राज्य सरकारचे पुरस्कार ! कोल्हापूर-सांगलीतील पाच जणांचा समावेश !शहीद सीताराम  कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहातलेकीचं सोनपाऊली स्वागत ! सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना अंगठी प्रदान !!मराठी भाषा असेपर्यंत मृत्युंजय वाचकप्रिय राहिल - जिल्हाधिकारी अमोल येडगेसमाजजीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्व, नैतिकता सांभाळणारे राजकारणीकोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण 

जाहिरात

 

जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी, पुरोगामीचे ग्रामविकासला निवेदन

schedule22 May 24 person by visibility 428 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपल्याने आचारसंहिता शिथील करून राज्यातील जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना द्यावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने नुकतेच ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना दिले.
 निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत टिपुगडे आदींच्या सह्या आहेत.
११ मार्च २०२४ च्या शासन पत्रानुसार नवीन नियुक्तीपूर्वी शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिलेले होते. दरम्यान लोकसभा आचारसंहिता सुरू झाल्याने जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया थांबली होती. वीस मे रोजी राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे संपल्याने महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील झाली आहे.  राज्यातील जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्याचे  आदेश सर्व जिल्हा परिषदांना द्यावेत अशी मागणी  संघटनेने केली आहे. 
     तसेच  सरकारच्या वित्त विभागास सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रूटी दूर कराव्यात, शालेय शिक्षण विभागास सर्व शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी वर्ग विना अट जोडावेत, संचमान्यता निकष अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्या केल्या आहेत.
   

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes