Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळे

schedule18 Jun 25 person by visibility 590 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला अशी माहिती संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी दिली. पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गेली तीस वर्ष कार्यरत आहे .संस्थेने चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे १०० कोटीच्या ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते . संस्थापक रसाळे यांच्या पारदर्शी आणि काटकसरीच्या मार्गदर्शनामुळे आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच संस्थेने हा टप्पा पूर्ण केला आहे.

संस्थेने ठेवीदारांच्या ठेवीवर योग्य मोबदला व वेळेवर परतावा देऊन एक विश्वासार्हता निर्माण केली. त्यामुळे व्यवहार वाढून संस्थेस तीन कोटी पाच लाखावर नफा झाला आहे. संस्थापक भरत रसाळे  म्हणाले, सुरवातीपासून स्वभांडवलावर संस्था चालवण्याचे ध्येय ठेवून शहर कार्यक्षेत्रात सुरु झालेल्या  संस्थेने  पाच हजार रुपया पासून ठेवीचा सुरू केलेला आपला प्रवास आज १०० कोटी पर्यंत नेऊन ठेवला आहे. संस्थेची उलाढाल  ५८४ कोटींवर गेलेली आहे .  तसेच संस्थेची  स्वमालकीची २ कोटीची इमारत, राखीव निधी ३ कोटी ७५ लाखावरआहे .सभासद, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांबरोबरच जनमानसात संस्थेने आपली एक विश्वासाहर्ता निर्माण केलेने १०० कोटी ठेवी जमा करण्याचे ध्येय साध्य झाले. सध्या प्रत्येक सभासदास ४५ लाख कर्ज वाटपा बरोबर  शंभर टक्के कर्ज वसुलीचे ध्येय ठेऊन उद्दिष्ट पूर्तीचे कार्य करत आहे."
संस्थेच्या या यशामध्ये माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, संचालक मंडळ व सल्लागार समिती सदस्यांची साथ मोलाची ठरली.  

विद्यमान व्हाइस चेअरमन कृष्णात चौगले, सचिव  वर्षाराणी वायदंडे, संचालक सूर्यकांत बरगे ,सर्जेराव नाईक,  माधुरी घाटगे, शिवाजी सोनाळकर, साताप्पा कासार, वसंत पाटील ,राजेश कोंडेकर, महादेव डावरे, रोहिणी यडगे, अमित परीट, संतोष आयरे, राजेंद्र कोरे त्याचबरोबर सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार ,आप्पासाहेब वागरे ,पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर ,दशरथ कांबळे विद्या पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व  कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes