+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Apr 24 person by visibility 2116 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. तपोवन मैदान येथे सभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
महायुतीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने उमेदवार आहेत. महायुती अतंर्गत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली आहे. 
या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीतील सगळे घटक पक्ष सक्रिय आहेत. दोन्ही जागा निवडून आणायच्या या इराद्याने महायुतीतील नेतेमंडळी काम करत आहेत. दरम्यान महायुतीतील या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची कोल्हापुरातील सभा निश्चित झाली आहे. मंडलिक व माने यांच्या प्रचारासाठी मोदी यांची २८ एप्रिल २०२४ रोजी तपोवन मैदान येथे सभा होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी दिली आहे. या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकार मधील इतर मंत्री  उपस्थित राहणार आहे. त्यामुळे २८ रोजी कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.