Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडककेआयटीच्या आदित्य साळुंखेस २७ लाख ५० हजाराचे पॅकेज ! बेट्टी ब्लॉक्स आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड !!  काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ब्रेक ! पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी !!बाजार समितीच्या तीन संचालकांना भाडेकरार भोवणार ? जिल्हा उपनिबंधकानी मागवली माहिती महावीर कॉलेजच्या नूतन बोधचिन्हाचे उदघाटनअध्यक्ष महायुतीचा, सत्ता महायुतीची म्हणता मग गोकुळमध्ये हसन मुश्रीफ इतके हतबल कसे काय ? सतेज पाटीलदोन वर्षात कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, कोल्हापूरच्या विकासात हे सेंटर मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर प्रा. विनय पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सतरा एप्रिलला सत्कार सोहळा, गौरव ग्रंथाचे प्रकाशनवाढीव सभासद संस्थेवरुन गोकुळमध्ये महायुतीमध्ये झुंपली ! मंत्री मुश्रीफ - आमदार शिवाजी पाटील आमनेसामनेआमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! विविध सामाजिक उपक्रम, गर्दीचा महापूर! !

जाहिरात

 

केआयटीच्या आदित्य साळुंखेस २७ लाख ५० हजाराचे पॅकेज ! बेट्टी ब्लॉक्स आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड !! 

schedule14 Apr 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम या विभागातील आदित्य साळुंखे या विद्यार्थ्याची ‘बेट्टी ब्लॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आय.टी.कंपनीमध्ये निवड झाली असून त्याला कंपनीने २७ लाख ५० हजार रुपयाचे पॅकेज घोषित केले आहे.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, उद्योगांशी एकात्मिक शिक्षण पद्धती, प्रगत प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) अनुभवाची संधी आणि कंपनी-विशिष्ट प्रशिक्षण यामुळे केआयटीमध्ये उत्तम प्लेसमेंट्स साध्य होत आहेत.अशा भावना आदित्य साळुंखे या विद्यार्थ्याने व्यक्त केल्या.

विद्यार्थी व विद्यार्थिनीना संरक्षित तसेच कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण, सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स, १०,००० हून अधिक ई-पुस्तकांचा डिजिटल लायब्ररीचा समृद्ध साठा आणि उच्च पात्रता व संशोधनाभिमुख प्राध्यापकवर्ग यांनी अशा प्लेसमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.अशा प्रकारचे मनोगत संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.

कंपनीच्या कार्य शैलीची व निवड प्रक्रीयेची विद्यार्थ्यांमध्ये वेळे आधीच जागृती केली जाते.प्रोत्साहन,प्रबोधन व प्रशिक्षण या त्रिसूत्रीच्या मुळेच अशा प्रकारचे यश विद्यार्थी मिळवत आहेत असे मत संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यांमुळे तसेच कामातील व व्यवहारातील प्रामाणिकतेमुळे विविध क्षेत्रांतील अनेक नामांकित कंपन्या केआयटीमध्ये प्लेसमेंटसाठी उत्सुकता दर्शवत असून, त्या कॉलेजशी सातत्याने संपर्क साधत आहेत, असा अनुभव संस्थेचे उपाध्यक्ष  सचिन मेनन यांनी व्यक्त केला.

संस्थेच्यावतीने विद्यार्थी आदित्य साळुंखे यांचा सत्कार झाला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली ,उपाध्यक्ष श्री सचिन मेनन सचिव श्री दीपक चौगुले,विश्वस्त श्री.दीपक जोशी,संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम विभागप्रमुख डॉ.मंजुनाथ हुदगी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes