Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका, जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होणार – सुप्रीम कोर्टाचा आदेशकृषी प्रदर्शनात गोकुळचा स्टॉल ! दुग्धजन्य पदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने - वैरण बँक ! !शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिमाखातहॉटेलमधील मेन्यूकार्डप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सीपीआरमध्ये दर, दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट उद्धवस्त करावे – शिवसेना उपनेते संजय पवारप्राध्यापक निलंबित, प्रभारी प्राचार्यांवर अॅक्शन कधी ?कार्यालयीन वेळेत शहर अभियंता गैरहजर, आयुक्तांकडून पगार कपात ! १९ कर्मचाऱ्यांवरही कारवाई! !प्रा. डॉ. आनंद पाटील यांचा चार डिसेंबरला नागरी सत्कार, २१०० पानांच्या तीन खंडांचे प्रकाशन मतदार यादीत निष्काळजीपणा नको, यंत्रणा सक्षम करा : आमदार क्षीरसागरांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचनाभारत येणाऱ्या काळात परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल - डॉ एस महेंद्र देवतपोवन मैदानावर पाच डिसेंबर पासून सतेज कृषी प्रदर्शन

जाहिरात

 

राजाराम कारखान्याच्या १३४६ सभासदांच्या अपात्रतेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

schedule22 Sep 22 person by visibility 562 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्राबाहेरील १३४५ सभासद प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर व तत्कालीन सहकार पणनमंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या 1346 सभासदांचे अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले
 राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने याबाबत सतत पाठपुरावा करणेत आलेला होता. सत्तारुढ महाडीक गटाला उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा हादरा बसला आहे असे आमदार सतेज पाटील गटाने म्हटले आहे.
सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने एकूण १८९९ हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे ६९ वगळून अपात्र १००८ व कार्य क्षेत्राबाहेरील ३३८ अशा १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते. या अपात्र सभासदांनी तत्कालीन सहकार व पणन मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. याबाबत त्यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनीही अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावले व प्रादेशिक सहसंचालकांचा १४ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेला निर्णय कायम ठेवला होता.
त्यानंतर या अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मे. सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी झाली. छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रवि कदम, ॲड. पी. डी. दळवी, ॲड. केदार लाड यांनी काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes