Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदमशिक्षकांच्या पगाराला विलंब, प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा आंदोलनाचा इशारामहापालिका शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकरशहीद महाविद्यालयात ग्लोबल कोल्हापुरी संवाद : अमेरिकेत कार्यरत युवा आयटी तंत्रज्ञांची अनोखी मैफलजिल्हा परिषदेची निवडणूक दोन दिवसात जाहीर ?चांगभलं…जनसुराज्य लढविणार २९ जागा  ! अक्षय जरग, प्रसाद चव्हाण, सुभाष रामुगडेंची बंडखोरी! !उमा बनछोंडेनी दाखल केला उमेदवारी अर्जप्रभाग क्रमांक चारमधून योगिता प्रवीण कोडोलीकरांनी भरला अर्जमहायुतीच्या उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, मतदारांचा ओसांडणारा उत्साह ! मंत्री - आमदारांसह कार्यकर्त्यांनी धरलेला फेर ! !महायुतीचे उमेदवार घोषित, २३ नगरसेवकांचा समावेश ! शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल ! !

जाहिरात

 

राजाराम कारखान्याच्या १३४६ सभासदांच्या अपात्रतेवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

schedule22 Sep 22 person by visibility 572 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्राबाहेरील १३४५ सभासद प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर व तत्कालीन सहकार पणनमंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या 1346 सभासदांचे अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले
 राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने याबाबत सतत पाठपुरावा करणेत आलेला होता. सत्तारुढ महाडीक गटाला उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा हादरा बसला आहे असे आमदार सतेज पाटील गटाने म्हटले आहे.
सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने एकूण १८९९ हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे ६९ वगळून अपात्र १००८ व कार्य क्षेत्राबाहेरील ३३८ अशा १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते. या अपात्र सभासदांनी तत्कालीन सहकार व पणन मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. याबाबत त्यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनीही अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावले व प्रादेशिक सहसंचालकांचा १४ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेला निर्णय कायम ठेवला होता.
त्यानंतर या अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मे. सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी झाली. छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रवि कदम, ॲड. पी. डी. दळवी, ॲड. केदार लाड यांनी काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes