Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटी पेपर फुटीत सिनीअर कॉलेजचा प्राचार्य, प्राध्यापक ! संस्था, जेडी ऑफिस, विद्यापीठाच्या अॅक्शनकडेही लक्ष ! !गर्दीच्या ठिकाणी-पर्यटनस्थळी शौचालय उभारणार ! कृष्णराज महाडिकांची परिवहनमंत्र्यासोबत चर्चा !!वसा सामाजिक कार्याचा, ध्यास कागलच्या विकासाचाप्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणीगोकुळतर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कारआगामी काळात लष्करामध्ये महिलाराज : कर्नल हेमंत जोशी  प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन१५९ स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन, २८ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणीही मॅन धर्मेंद्र यांचे कलापूरशी नाते, कोल्हापुरी पाहुणचाराने भारावले होतेऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नगरसेवक भेटले प्रशासकांना

जाहिरात

 

हातकणंगलेत मीच, उमेदवार बदलाची बातमी म्हणजे एप्रिल फूलचा प्रकार-धैर्यशील माने

schedule02 Apr 24 person by visibility 423 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार बदलणार ही बातमी म्हणजे एप्रिल फूलचा प्रकार आहे. माझ्या उमेदवारीत आता कोणताही बदल नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून मी साऱ्यांना आश्वस्त करतो. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.’अशी स्पष्ट भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व  विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
 खासदार माने यांची उमेदवारी बदलणार अशी चर्चा एक एप्रिल रोजी सर्वत्र पसरली होती. त्या अनुषंगाने खासदार माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मीच आहे. महायुतीशी संब्ंधित सगळया पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या साऱ्याच पक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारी विषयी कसलाही संभ्रम नाही. ’
खासदार माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला. माने म्हणाले, ‘राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी उंबरे झिजवत आहेत. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान नाही. संघटनेच्या नावात स्वाभिमान केवळ नावापुरता शिल्लक आहे.  शेट्टी हे कधीही एखाद्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत. प्रत्येकवेळी ते नवीन गोष्टी करत असतात. मतदारसंघातील नागरिकांना ते माहित आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. संघटनेचे नाव स्वाभिमानी ठेवली म्हणून कोणी स्वाभिमानी होत नाही. स्वाभिमानाने वागावे लागते. मात्र शेट्टी हे स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes