+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule02 Apr 24 person by visibility 210 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार बदलणार ही बातमी म्हणजे एप्रिल फूलचा प्रकार आहे. माझ्या उमेदवारीत आता कोणताही बदल नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून मी साऱ्यांना आश्वस्त करतो. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.’अशी स्पष्ट भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व  विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
 खासदार माने यांची उमेदवारी बदलणार अशी चर्चा एक एप्रिल रोजी सर्वत्र पसरली होती. त्या अनुषंगाने खासदार माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मीच आहे. महायुतीशी संब्ंधित सगळया पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या साऱ्याच पक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारी विषयी कसलाही संभ्रम नाही. ’
खासदार माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला. माने म्हणाले, ‘राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी उंबरे झिजवत आहेत. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान नाही. संघटनेच्या नावात स्वाभिमान केवळ नावापुरता शिल्लक आहे.  शेट्टी हे कधीही एखाद्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत. प्रत्येकवेळी ते नवीन गोष्टी करत असतात. मतदारसंघातील नागरिकांना ते माहित आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. संघटनेचे नाव स्वाभिमानी ठेवली म्हणून कोणी स्वाभिमानी होत नाही. स्वाभिमानाने वागावे लागते. मात्र शेट्टी हे स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करण्याचे काम करत आहेत.’