Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणारमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील केआयटीत जागतिक दर्जाचे डिझाइन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांसाठी उपलब्धकरुन दाखविलं…केएमटीला मिळतोय नवा चेहरा, सेवेचा परिघ विस्तारणार! रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायमची शाश्वती !! २७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणार

जाहिरात

 

ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा 

schedule01 Aug 26 person by visibility 18 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम,कोल्हापूर चित्पावन संघ आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वा.रा तथा दादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रोहिणी परांजपे यांचे " संतांचे संगती" या विशेष निरूपण सोहळ्याचे आयोजन  ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केले आहे. अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी  यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राम गणेश गडकरी सभागृह,पेटाळा येथे दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत निरुपण सोहळा होणार आहे. या निरुपण सोहळयात संत महात्म्य आणि संत चरित्र ऐकण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना घेता येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या निरूपणामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या अलौकिक गाथा सांगण्यात येणार आहेत. तरी आत्मानंद देणाऱ्या या भक्तीमय सोहळ्याचा लाभ आवर्जून घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीने करण्यात आले.हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य  असून कार्यक्रम दिलेल्या वेळेत सुरू होणार असल्याने उपस्थित श्रोत्यांनी वेळेच्या दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.  पत्रकार परिषदेस चित्पावन संघाचे प्रसाद भिडे , श्रीकांत लिमये , मिलिंद पावनगडकर , नंदकुमार मराठे,श्रीराम टोपकर,सचिन जिल्हेदार, संतोष कोडोलीकर , धर्मराज पंडित,डॉ. उदय कुलकर्णी, अनिरुद्ध जावडेकर अशोक जोशी आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes