Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहीद सीताराम  कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहातलेकीचं सोनपाऊली स्वागत ! सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना अंगठी प्रदान !!मराठी भाषा असेपर्यंत मृत्युंजय वाचकप्रिय राहिल - जिल्हाधिकारी अमोल येडगेसमाजजीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्व, नैतिकता सांभाळणारे राजकारणीकोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई कराडेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

बाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !!

schedule23 Oct 24 person by visibility 695 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘उद्यमनगरीचा अभ्यासू आणि उत्साही उद्योजक म्हणजे गजेंद्र उर्फ बाबाभाई वसा होतं. त्यांनी केवळ व्यवसायच केला नाही तर अनेक उद्योजक-व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम राहिले. नवं व्यावसायिकांचे स्वागत केले.’अशा भावना शोकसभेत उमटल्या.  
 उद्योजक  बाबाभाई ठाकरसी वसा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाटी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शोकसभा आयोजित केली होती. या सभेत भावना व्यक्त करताना  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर म्हणाले, ‘ बाबाभाई वसा दानशूर व्यक्तीमत्व होते.त्यांनी केवळ बिझनेस केला नाही तर लोकसंग्रह वाढविला. प्रत्येक उद्योजकाचे  नेहमीच उत्साहाने स्वागत करायचे. एका उत्साही उद्योजकांस कोल्हापूरच्या उद्यमनगरीने गमावला.’स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, ‘बाबाभाईंनी उद्योग क्षेत्राची येथून सुरवात करून उद्योग क्षेत्राला झळाळी दिली. प्रेमळ, शांत सुस्वभावी, स्वच्छ व पारदर्शी व्यवहार म्हणजे बाबाभाई. उद्योग क्षेत्रात त्यांच्यामुळे खुप मोठा प्रभाव पडला.’ सचिन मेनन म्हणाले,  ‘बाबाभाई उत्साही मनाने सर्वांशी वागायचे, त्यांचे कोणाशीही मतभेद झाले नाही. त्यांचे निणर्य सर्वांनाच मान्य असायचे, त्यांच्या बाहेर आणि मनातही कधी रागाचा लवलेशही दिसला नाही.’ मोहन कुशिरे यांनी,  ‘ संघटनेत राहून आपली गुणवत्ता कशी असली पाहिजे यासंबंधीची शिकवण दिल्याचे सांगितले.
साजिद हुदली यांनी बाबाभाई उत्कृष्ट खेळाडू होते. अनेक समस्यावर चांगला मार्ग काढायचे चेहरा हसरा ठेवून म्हणायचे तुझा नशिबातील कोणीही काढून घेवू शकत नाही. आज या उद्यमनगरीने तुम्हाला जे शिकविले ते कोठेही मिळणार नाही, त्यांच्यामुळे आंम्हास अनेक संधी मिळाल्या.’याप्रसंगी संजय पेंडसे, प्रदीप कापडिया,  श्रीकांत दुुधाणे, नितीन वाडीकर,  एम. वाय. पाटील, कमलाकांत कुलकर्णी यांनीही त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.   
 याप्रसंगी  उद्योजक प्रसन्न तेरदाळकर,  हर्षद दलाल, जयदिप मांगारे, विश्वजित सावंत, हिंदूराव कामते, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव, श्रुीमती साधना वसा, मनिषा देसाई, तेजल मेहता, हार्दिका वसा, दिप वसा, देविका वसा, कुश वसा, रोहीत वसा, जयराज वसा, किरण वसा,गिरीष वसा, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes