Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा कोल्हापूर जिल्ह्याला मानवाशीचे सामाजिक कार्यकर्ते सरदार रानगेंचा भाजपात प्रवेशडीवाय पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआषाढी वारीत कुलगुरू, प्रकुलगुरू ! शिवाजी विद्यापीठातर्फे स्वच्छतेतून सेवाभाव ! !कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शकराज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी संतोष पाटीलवारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप  कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधन

जाहिरात

 

बाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !!

schedule23 Oct 24 person by visibility 1056 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘उद्यमनगरीचा अभ्यासू आणि उत्साही उद्योजक म्हणजे गजेंद्र उर्फ बाबाभाई वसा होतं. त्यांनी केवळ व्यवसायच केला नाही तर अनेक उद्योजक-व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम राहिले. नवं व्यावसायिकांचे स्वागत केले.’अशा भावना शोकसभेत उमटल्या.  
 उद्योजक  बाबाभाई ठाकरसी वसा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाटी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शोकसभा आयोजित केली होती. या सभेत भावना व्यक्त करताना  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर म्हणाले, ‘ बाबाभाई वसा दानशूर व्यक्तीमत्व होते.त्यांनी केवळ बिझनेस केला नाही तर लोकसंग्रह वाढविला. प्रत्येक उद्योजकाचे  नेहमीच उत्साहाने स्वागत करायचे. एका उत्साही उद्योजकांस कोल्हापूरच्या उद्यमनगरीने गमावला.’स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, ‘बाबाभाईंनी उद्योग क्षेत्राची येथून सुरवात करून उद्योग क्षेत्राला झळाळी दिली. प्रेमळ, शांत सुस्वभावी, स्वच्छ व पारदर्शी व्यवहार म्हणजे बाबाभाई. उद्योग क्षेत्रात त्यांच्यामुळे खुप मोठा प्रभाव पडला.’ सचिन मेनन म्हणाले,  ‘बाबाभाई उत्साही मनाने सर्वांशी वागायचे, त्यांचे कोणाशीही मतभेद झाले नाही. त्यांचे निणर्य सर्वांनाच मान्य असायचे, त्यांच्या बाहेर आणि मनातही कधी रागाचा लवलेशही दिसला नाही.’ मोहन कुशिरे यांनी,  ‘ संघटनेत राहून आपली गुणवत्ता कशी असली पाहिजे यासंबंधीची शिकवण दिल्याचे सांगितले.
साजिद हुदली यांनी बाबाभाई उत्कृष्ट खेळाडू होते. अनेक समस्यावर चांगला मार्ग काढायचे चेहरा हसरा ठेवून म्हणायचे तुझा नशिबातील कोणीही काढून घेवू शकत नाही. आज या उद्यमनगरीने तुम्हाला जे शिकविले ते कोठेही मिळणार नाही, त्यांच्यामुळे आंम्हास अनेक संधी मिळाल्या.’याप्रसंगी संजय पेंडसे, प्रदीप कापडिया,  श्रीकांत दुुधाणे, नितीन वाडीकर,  एम. वाय. पाटील, कमलाकांत कुलकर्णी यांनीही त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.   
 याप्रसंगी  उद्योजक प्रसन्न तेरदाळकर,  हर्षद दलाल, जयदिप मांगारे, विश्वजित सावंत, हिंदूराव कामते, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव, श्रुीमती साधना वसा, मनिषा देसाई, तेजल मेहता, हार्दिका वसा, दिप वसा, देविका वसा, कुश वसा, रोहीत वसा, जयराज वसा, किरण वसा,गिरीष वसा, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes