+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Jan 23 person by visibility 258 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्या पंचाहत्तरी निमित्त ' अमृतमहोत्सवी गौरव 'समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
 १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन,दसरा चौक या ठिकाणी या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी रसिकांच्या मनावर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे कवी म्हणून अशोक नायगावकर सर्वपरिचित आहेत.
               यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते  नायगावकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतेज पाटील, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील उपस्थित राहणार आहेत. तर अशोक नायगावकर यांच्या साहित्य आणि व्यक्तिमत्त्वावर डॉ.विजय चोरमारे,डॉ. रफीक सुरज हे वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत. या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य सभेच्या वतीने करण्यात आले आहे.