महावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबार
schedule06 Jun 25 person by visibility 32 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरणच्या वीज प्रश्नांसंबंधी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी, ( ९ जून २०२५ ) ऊर्जा दरबार आयोजित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृह येथे दुपारी एक वाजता ऊर्जा दरबार होईल. त्यासाठी जिल्ह्यातील महावितरण संबंधित वरील योजनां संदर्भात अडचणी व तक्रारी असतील त्यांनी https://qr.me-qr.com/iNIwLoQP या संकेत स्थळावर आठ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी महावितरणच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करणेत येत आहे. महावितरण दरबारमध्ये प्राप्त होणा-या अर्जाबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे महावितरण कोल्हापूर मंडलचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणचे सहा विभागीय कार्यालय असून एकूण वीज ग्राहक संख्या बारा लाख ५८ हजार इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणद्वारे घरगुती, औद्योगिक, व्यापारी, शेतीपंप व इतर ग्राहकांना वीज पुरवठा देऊन जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले जाते. महावितरणमध्ये सद्या ग्राहकांना देणेत येणाऱ्या योजनांमध्ये ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा पॅनेलद्वारे वीज पुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौरपंप देणे इत्यादी योजनांचा समावेश आहे.