Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंदोलनातील शिक्षक -कर्मचाऱ्यांचे दोन दिवस विनावेतन होणारदूरशिक्षणसह ऑनलाईन शिक्षण आजची गरज : डॉ. विलास शिंदेकोल्हापूर-वैभववाडी रेल्वे संदर्भात दिल्लीत रेल्वेमंत्र्यांच्यासोबत बैठक घ्यावी-कोल्हापूर फर्स्टची मागणीराज्यस्तरीय विज्ञान कथा स्पर्धा, कथा पाठविण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंतकोल्हापुरातील आयटी पार्कसाठी राजेश क्षीरसागरांची विधिमंडळात लक्षवेधी ! लवकरच बैठकीची राज्यमंत्र्यांची ग्वाही !!महापालिकेत आयुक्तपदी महिला, पण शहरात महिलांच्यासाठी स्वच्छतागृहांची वाणवा पिढया बदलतील, वक्ते-श्रोते नवीन असतील ! तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील !!केंद्रीयमंत्र्यांनी केले गोकुळचे कौतुक ! सहकार मंत्रालयामार्फत सहकार्याची ग्वाही !!पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रिन्स शिवाजी जाधववाडी शाळेचे यशपन्हाळा नगरपरिषदचे सुपर स्वच्छ लीगमध्ये देशपातळीवर यश, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

जाहिरात

 

राज्यस्तरीय विज्ञान कथा स्पर्धा, कथा पाठविण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत

schedule18 Jul 25 person by visibility 61 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अक्षर दालन आणि निर्धार प्रतिष्ठान आयोजित ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पारितोषिक विजेत्या कथासंग्रहाचे पुस्तक प्रसिध्द केले जाईल. हे पुस्तक प्रतिवर्षी डॉ. नारळीकर यांच्या स्मृतिदिनी २० मे रोजी प्रकाशित करून याच दिवशी कथा स्पर्धेचे पुरस्कार वितरण आणि व्याख्यान असा कार्यक्रम होईल अशी माहिती संयोजक व ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, प्रकाशक अमेय जोशी यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धा आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर यांचे स्मरण कायम राहण्याबरोबरच मराठी साहित्याला सकस विज्ञानकथांच्या स्वरूपातून नवलेखकांचे योगदान देणे. युवा वर्गाला सकस विज्ञान कथालेखनाला प्रवृत्त करणे हा आहे.  स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये व सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक ४ हजार रुपये व  सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिक २ हजार रुपये व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ पारितोषिक १ हजार रुपये व  सन्मानपत्र असे बक्षीस आहे. निकष पूर्ण करणाऱ्या स्पर्धात्मक कथांसाठी सन्मानपत्र दिले जाईल. कथा ३ हजार ते ५ हजार शब्दांपर्यंत असावी आणि अप्रकाशित असावी.

कथा वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करणारी असावी. कोणत्याही वयाच्या स्पर्धकाला भाग घेता येईल. स्पर्धकांनी आपल्या कथा ई मेलवर (Email-vidnyankathanaralikar@gmail.com) पाठवाव्यात. कथा पाठविण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ आहे. स्पर्धकांनी आपली किमान माहिती, पत्ता, संपर्क क्र., शिक्षण, अनुभव, कौशल्य इतर माहिती कथेसोबत पाठवावी. स्पर्धकांनी आपल्या कथा ई मेलने पाठवाव्यात. कथा युनिकोड टाईपमध्ये असाव्यात व वर्ड फाईल असावी. प्रवेश निःशुल्क आहे.  अक्षर दालन, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ कोल्हापूर मोबाईल क्र. ८७८८९५८००५ संपर्क साधावा.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes