Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणी टंचाईवरुन नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव टाकला लांबणीवरशिवाजी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या १५० विद्यार्थ्यांची कंपन्यात निवडशिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १९ विद्यार्थी यशस्वीकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक, डॉ शिवशंकर मोरजक्केंचे विशेष कौतुकसंजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!

जाहिरात

 

आयुष्यमानसाठी रेशनकार्डवर बारा अंकी नंबर त्वरित मिळावा - भाजपा शिष्टमंडळाने मागणी

schedule08 Jul 24 person by visibility 596 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक असणारा शिधापत्रिकावर बारा अंकी नंबर त्वरित द्यावा आणि नागरिकांची अडवणूक थांबवावी  अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे. 
भाजपचे जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन दिले. यावेळी शहर पुरवठा अधिकारी नितीन धापसे-पाटील उपस्थित होते. जिल्हा पुरवठा कार्यालयातील कामासंबधित नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असल्या जिल्हाध्यक्ष यांनी नाराजी व्यक्त केली.
आयुष्यमान भारत योजना नवीन घोषित निर्णयाप्रमाणे केशरी व शुभ्र शिधापत्रिका धारकांना पाच लाखापर्यंत मोफत औषध उपचार मिळणे कारणी शहर पुरवठा कार्यालयातून बारा अंकी नंबर मिळण्यासाठी  दिरंगाई होत आहे. या अनुषंगाने भाजपाने निवेदन दिले.  भाजपा जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, पोर्टल, ई सेवा केंद्र येथे अर्ज करून अनेक महीने उलटून सुद्धा या कार्यालयाकडून सर्व सामान्य जनतेची अडवणूक केली जात आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची वन नेशन वन रेशन आणि डिजिटल रेशनकार्ड ह्या संकल्पनेस धक्का पोहचू नये याची दक्षता घ्यावी.’
 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, रोहित पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ. सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, शैलेश पाटील, विराज चिखलीकर, विजयसिंग खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, आशिष कपडेकर, रोहित पोवार, रमेश दिवेकर, संगीता खाडे, अभिजित शिंदे, महेश यादव, प्रग्नेश हमलाई, डॉ. शिवानंद पाटील, रविकिरण गवळी, कोमल देसाई आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes